Amalner

Amalner: अमळनेर येथील ग्रामसेवक एलसीबीच्या जाळ्यात..!वीट भट्टी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच…

Amalner: अमळनेर येथील ग्रामसेवक एलसीबीच्या जाळ्यात..!वीट भट्टी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच…

अमळनेर: वीटभट्टीचा व्यवसाय नियमित करण्यासाठी ग्रामसेवकाने २५ हजार रुपये किमतीची लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा जळगाव
स्थानिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवासी असून त्यांचे गावातच वीज वीटभट्टीचा व्यवसाय करत आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडून व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला होता, यात ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील (वय-55, रा. सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे अमळनेर) यांनी २७ हजार ५०० रुपयांची लाची मागणी केली होती. तडजोडीअंती पंचवीस हजार रुपयाची लाच देण्याचे ठरविले. दरम्यान याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत विभागाच्या पदालाकडे तक्रार दिले.
या अनुषंगाने पथकाने सापळा रचून २५ हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील याला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button