गरीब कुटुंबांना रेशनचे धान्य मिळणे बाबत मा.तहसीलदार साहेबांना निवेदन
मनोज भोसले
दहीवद गावातील गरीब कुटुंबाला रेशन मिळत नाही तसेच काही गरीब कुटूंबाकडे अनेक दिवसा पासून रेशन कार्डच नाही त्यांचे मुळे या कुटुंबाला फक्त रेशनच नाही परंतु शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही. या गरीब कुटूंबावर अन्याय होत आहे म्हणून हे काम हाती घ्यावे लागले या कामात आमचा कुणाशी मतभेद कींवा कुठलेही स्वार्थ कींवा कुठलेही राजकीय स्वार्थ नाही परंतु आजची परिस्थिती देशावर, राज्यावर,काही शहरांवर,गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे हातावर जीवन जगणार्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाकडून या रेशन कार्डच्या माध्यमातून जे काही धान्य मिळेल तेव्हढीच मदत होईल त्या कामी अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा ना छगनरावजी भुजबळ साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना गुलाबरावजी पाटील साहेब, तालुक्याचे आमदार मंगेशजी चव्हाण,मा.तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.मा.तहसिलदार यांना निवेदन देतांना शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमूख चाळीसगाव तालुका व उपसरपंच नानासो भिमराव खलाणे,शिवसेना उपतालुका प्रमूख दादासो हींमत निकम,शेतकरी संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष व माहिती सेवाभावी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष दादासो पंकज पवार,लखन मोरे उपस्थित होते.