आजची युवा पिढी भारताच्या उज्वल इतिहासाशी जोडली जावी – कर्नल प्रवीण धीमन
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल
भारत भूमीचा ज्वाजल्य इतिहास अवघ्या जगाला आदर्शवत आणि प्रेरणादायी असताना आज-काल पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाला तरुणवर्ग बळी पडत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने प्रत्येक भारतीयाने आपला उज्वल इतिहास आठवावा आणि देशाच्या विकासात मोलाची भर टाकावी असे आवाहन कर्नल प्रवीण धीमन, समादेशक अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगाव यांनी केले.
ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात स्वातंत्र्य दिवसाच्या औचित्याने आयोजित ध्वजारोहन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव च्या वतीने कर्नल प्रवीण धीमन, समादेशक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 150 किलोमीटर सायकलिंग रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात काव्यरत्नावली चौक, जळगाव येथून झाली तर समाप्ती गांधीतीर्थ, जळगाव येथे होणार आहे. यात मुळजी जेठा महाविद्यालय, जळगांव येथील 10 कडेटस यांनी सुद्धा सहभाग घेतला.
दरम्यान महाविद्यालयाच्या ध्वजारोहन सोहळ्याप्रसंगी फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीत राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती ताज्या करण्यात आल्या. यावेळी कर्नल प्रवीण धीमन यांनी ‘कनेक्टिंग युथ विथ हिस्ट्री’ या थीम अनुसार भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मैलाचा दगड ठरलेल्या फैजपूर येथील पहिल्या राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण अधिवेशनाच्या चित्र प्रदर्शनाला भेट दिली.
यावेळी ध्वजारोहण सोहळा धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एल चौधरी, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पिंगला धांडे, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेना कडेट्स उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी स्वातंत्र लढ्यात फैजपूर च्या पावन भूमीचे स्मरण ठेवून देशाची प्रभुता आणि अखंडितता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी सहयोग द्यावा. संस्था प्रमुख माननीय आमदार दादासाहेब शिरीष चौधरी दादासाहेब धनाजी नाना चौधरी, कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा समर्थ वारसा पुढे यशस्वीपणे चालवत आहेत. कोरोना काळ आपल्या साऱ्यांसाठी परीक्षेचा काळ होता मात्र सर्वांच्या सहयोगाने आपल्या या महामारीवर मात करीत आहोत. महाविद्यालयातील तरुणांनी या भूमीचा ऐतिहासिक वारसा समजून घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार व व स्थानिक प्रशासन यांच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व सोशियल डिस्टन्ससिंग चे पुरेपूर पालन करण्यात आले. यावेळी एनसीसी कॅडेटस च्या वतीने मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर कोमलसिंग, सुभेदार जयपालसिंग, हवालदार जसविंदर, राष्ट्रीय सण उत्सव समितीचे प्रमुख डॉ आय पी ठाकूर, एन सी सी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ डी एल सूर्यवंशी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा शेरसिंग पाडवी, डॉ सरला तडवी, श्री नितीन सपकाळे, श्री संतोष तायडे, श्री विलास चौधरी, श्री डी एस चव्हाण , श्री गुलाब वाघोदे, श्री नारायण जोगी, श्री राजेंद्र ठाकूर, श्री सिद्धार्थ तायडे, श्री शेखर महाजन, चेतन इंगळे, सुधीर पाटील, मंदार बामनोदकर आदींनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.






