sawada

रावेर-सावदा महामार्गावरील महाकाय खड्डे श्रीराम फाऊंडेशन यांनी स्वखर्चाने बुजविले!

रावेर-सावदा महामार्गावरील महाकाय खड्डे श्रीराम फाऊंडेशन यांनी स्वखर्चाने बुजविले!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यान असलेले महामार्ग रस्त्यावरील खड्डे श्रीराम फाऊंडेशन रावेर अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी स्वखर्चातून आज बुधवार रोजी दुपारी बुजविले. आहेत
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाचा अहवाल तयार करण्यात येत असून सध्या , सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वादात हा रस्ता अडकला आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठीच श्रीराम फाऊंडेशन चे श्रीराम पाटील यांच्या पुढाकारातून या रस्त्यावरील संपूर्ण खड्डे दिनांक ७ सप्टेंबर रोज बुधवार रोजी मुरूम टाकून बुजवण्यात आले
या महामार्गवर अनेक वेळा खड्डे चुकवताना अपघात झाले या अपघातामध्ये वाहन धारकांना अर्धांग वायू व जीव गमवावा लागत असतो, बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठी वाहतूक असून अनेक वेळा खड्डे चुकवताना वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक नागरिकाचे प्राण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी व त्याच्यासाठी अनमोल असा आहे. रावेर तालुक्यातील व रस्त्यावर कुणाचाही अपघातात जीवीत हानी होऊ नये यासाठी श्रीराम पाटील त्याच्या श्रीराम फाऊंडेशन च्या माध्यमातून स्वखर्चाने ४० ब्रास मुरूमाचे परवानगी काढून खड्डे बुजविले.हा त्यांचा प्रयत्न नागरिकांना सुखद धक्का देऊन गेला.

।आज सकाळी रावेर येथील श्रीराम ऑटो पासून सुरुवात केली. सावदा येथे एल.आय.सी. कार्यालय समोरील आणि
दुपारी ४ वाजता साईबाबा मंदिर जवळील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले.यावेळी उद्योजक श्रीराम पाटील,साईनाथ इरिगेशचे स्वप्निल पाटील आदी.उपस्थित होते.या उपक्रमाचे यावेळी रस्त्यावर जाणाऱ्या वाहनधारकांनी प्रतिक्रिया व्यक्त करून कौतुक केले.यावेळी बोलताना श्रीराम पाटील म्हणाले या महामार्गावर पडलेले खड्डे खरोखरच जीव घेणे आहेत.वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आपण हे काम हाती घेतले.हे काम करण्या.मागे माझी कोणतीही राजकीय भूमिका नसून समाजाचे आपण कुठे तरी काही देणे लागतो आणि अपघाताची दुर्घटना टाळावी हीच या मागची भावना आपली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button