बोगस शिक्षक भरती प्रकरणाबद्दल दिलेल्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यास उच्च न्यायालयाची नोटीस सावदा प्रकरण अँग्लो उर्दू हायस्कुल
युसूफ शाह सावदा
सावदा : सावदा तालुका रावेर जिल्ह्या जळगांव येथील इबेहाद एज्युकेशन सोसायटी व्दारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कुल या शाळेत बोगस प्रस्तावाच्या आधारावर पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षण अधिकारी माध्यमिक जि.प.जळगांव यांच्या संगनमताने सहभागाने सन २०१२ पासून कार्यरत नसलेल्या शिक्षकांना पगार पोटी रक्कम अदा करून अपहार केलेबाबत दोषींवर भारतीय दंड संहिता प्रमाणे कारवाई करणे कामी यांनी दिलेल्या सविस्तर तक्रारीची वेळीत दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने न्याय मिळणे करीता तक्रारदार शेख हरून शेख इकबाल यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ फौजदार स्वरूपाची जनहित याचिका दाखल केली असता शाळा संबंधिता ऐवजी प्रथम तक्रारीची वेळेत दखल न घेणारे मा.शिक्षण अधिकारी माध्यमिक जि.प. जळगांव,मा.जिल्ह्या पोलीस अधीक्षक जळगांव सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सावदा यांना नोटीसा बजवून दिनांक २१/१२/२०२० रोजी हजर राहण्याचे खंडपीठाने आदेशात केल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे.
अधिक माहिती अशी की,अँग्लो उर्दू हायस्कुल मध्ये सन २०१२ पासून कार्यरत नसलेले मात्र शाळा संचालकांचे जवळील व रक्ताचे नातेवाईक असल्यामुळे मुख्याध्यापकास अंधेरात ठेवून बनावट व खोटे कागदोपत्री प्रस्ताव तयार करून त्यावर मुख्याध्यापकांच्या खोट्या व बनावटी सह्या करून शेख दानिश शेख समीर बागवान,शेख सलिम अहमद शेख सुपडू पिंजारी या दोघांची शिक्षक म्हणून नियुक्ती दाखवून शाळा संचालकांनी शिक्षण अधिकारी यांच्या संगनमताने पुर्वलक्षी प्रभावाने मान्यता देऊन सन २०१२ पासून त्यांना शिक्षण सेवक कार्यरत दाखवून प्रथम तीन वर्षासाठी व नंतर सन २०१९ मध्ये त्यांना नियमित वेतनश्रेणी मान्यता प्राप्त झाली.परंतु संपूर्ण शिक्षक भरती प्रकरण फक्त एक जादुई खेळ सारखा वाटत आहे.कारण की शिक्षक भरती,प्रस्ताव पासून तर मान्यता पर्यत शालार्थ आयडी, व नियमित मान्यता वेतन पर्यतच्या कागदोपत्रांवर मुख्याध्यापक सह सध्याचे याचिकाकर्ता व त्या काळचे संस्था अध्यक्ष यांच्या खोट्या बनवती सह्या केलेल्या असून संगनमताने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.
तसेच सदरील बनावट सह्याबद्दल मुख्याध्यापक यांनी सुद्धा त्यावेळी जिल्ह्या पोलीस अधीक्षक, शिक्षण अधिकारी तसेच वेतन विभागात सदरील अधिकाऱ्यांकडे त्वरित अर्ज केलेले आहे.
परिणामी या संपूर्ण गंभीर व दखल पात्र प्रकरबद्दल दोषींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल होणे कामी संबंधित अधिकाऱ्यांकडे शेख हरून शेख इकबाल यांनी केलेली तक्रारीची वेळेत दखल घेण्यात आली नसल्याने तक्रारदार यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ खंडपीठात फौजदारी स्वरूपाची याचिका दाखल केल्याने शिक्षण अधिकारी जळगांव,जिल्ह्या पोलीस अधीक्षक जळगांव, व सहाय्यक पोलीस निरीक्षक सावदा यांना नोटीस बनवण्यात आले.
यामुळे अँग्लो उर्दू हायस्कुल मध्ये बोगस पणे भरती करण्यात आलेले शिक्षक व शाळा सबंधितांवर भविष्यात कायद्याची टांगती तलवार पडण्याची दाट शक्यता अडल्याचे त्यांचे धाबे दणाणले आहे.तसेच पुढे त्यांच्यावर काय कठोर कारवाई होईल याकडे शहरातील जागृत नागरिकांचे लक्ष लागून आहेत.