Maharashtra

आपत्ती व्यवस्थापन काळात “राजकारण”करणे हे अत्यंत दुर्दैवी…

आपत्ती व्यवस्थापन काळात “राजकारण”करणे हे अत्यंत दुर्दैवी..ना. बच्चू कडू

देश आणी राज्य कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवरून राज्याचे शालेय शिक्षण,जलसंपदा, कामगार राज्यमंत्री ना.बच्चू कडू संतप्त झाले असून त्यांनी आज विरोधकांचा समाचार घेतला.

सत्ता तर सोडाच पण संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनताच रस्त्यावर फिरू देणार नाही.ही वेळ राजकारणाची नसून कोरोना संकटातून देश आणी राज्य बाहेर काढण्याची आहे.अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

विरोधकांनी ज्या पद्धतीने आंदोलन,टीका करण्याचा मार्ग निवडला हा मार्ग या स्थितीत चुकीचा असून विरोधकांचा आपण निषेध करतो या शब्दात ना.बच्चू कडू यांनी विरोधकांवर प्रहार केला. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख असलेल्या ना.बच्चु कडू यांनी पहिल्यांदाच विरोधकांचा आक्रमकपणे समाचार घेतला आहे.ते एका स्थानिक वृत्त वाहिनी सोबत बोलत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button