जानवे येथील ग्रामस्थांनी पीकविमा सरसकट मंजूर करण्या संदर्भात तहसीलदारांना दिले निवेदन
अमळनेर :- तालुक्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यासाठी पीकविमा सरसकट मंजूर करण्यात यावा यासाठी जानवे ग्रामस्थांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, ह्या वर्षी २१ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान तालुक्यात अस्मानी संकट कोसळले होते. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून जानवे तसेच अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा अहवाल पीकविमा कंपनीला देण्यात यावा. तसेच सरसकट पीकविमा मंजूर व्हावा ह्या करता शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन देते वेळी जानवे येथील शरद नथ्थू पाटील, रविंद्र झावरू पाटील, प्रकाश पाटील, कैलास पाटील, मुरलीधर पाटील,अनिल पाटील,योगेश पाटील,संदिप पाटील,मनोज पाटील,भैय्या पाटील व यासह ग्रामस्थ हजर होते.