Amalner

?️अमळनेर कट्टा…संचारबंदी च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा..माजी आमदार साहेबराव पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी…

?️अमळनेर कट्टा…संचारबंदी च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा..माजी आमदार साहेबराव पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी…
अमळनेर १ जून, २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपावेतो दिनांक १५ मे, २०२१ चा आदेशाच्या अंमलबजावणी बाबत.
१) आपला कार्यालयीन दिनांक २२ एप्रिल, २०२१ आणि दिनांक ३० एप्रिल,
२०२१ आणि १५ मे, २०२१ चा आदेश.
२) मा. उच्च न्यायालय मुंबई – खंडपीठ औरंगाबाद आदेश (लोकमत१३ मे, २०२१) (सोबत)
उपरोक्त विषयांकीत आदेशान्वये कोरोना विषाणू (कोव्हिड- १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय साथरोग अधिनियम, १८९७ अन्वये दिनांक १२ मे, २०२१ अन्वये संपूर्ण जळगांव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निबंध दिनांक १ जून, २०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपावेतो वाढविण्याचा दिनांक २२ एप्रिल, २०२१ व दिनांक ३० एप्रिल २०२१, रोजीचा आदेशाचे निबंधासह
आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
तथापि:- संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील दैनिक वृत्तपत्रे, व्हाटस्-अॅप, फेसबुक, यू-ट्यूब चॅनल मधील फाटोंसह बातम्या पाहिल्यावर विवाह समारंभ,राजकीय बैठका, राजकीय पक्षांची निवेदने, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे निवेदने आंदोलने सर्रास उल्लंघन करीत आहेत. जिल्ह्यात संचार बंदी लागू आहे (संदर्भ क्र. १) तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश (संदर्भ क्र.२) असतांनाही
काटेकोर पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढून तिसरी लाट येण्याची तज्ञांच्या सुचनेनुसार शक्यता नाकारता येत नाही एकीकडे सामान्य जनतेवर कारवाईचा प्रहार होत असतांना शासकीय, राजकीय व्यक्तींकडून नियमभंग होत आहेत वृत्तपत्रातील फोटोंसह बातम्या, सोशल मिडीयावरील फोटो आदि शोशल
डिस्टनसींन पाळल्यामुळे ते पुरावे ग्राह्य धरुन उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, मधील कलम ५१ ते ६० फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button