Kolhapur

माझा माझ्या जनतेवर विश्वास आहे,या विश्वासावरच ही निवडणूक लढवत आहे : समरजितसिंह घाटगे

माझा माझ्या जनतेवर विश्वास आहे,या विश्वासावरच ही निवडणूक लढवत आहे : समरजितसिंह घाटगे

तुकाराम पाटील,कागल

मला भाजपची उमेदवारी निश्चित होती,, पण घडले वेगळेच,!आता मी विधानसभेची निवडणुक फक्त जनतेच्या विश्वासावरच लढणेचा निर्णय घेतला आहे. माझा माझ्या जनतेवर विश्वास आहे.असे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले.

सुरुपली,कुरुकली,सोनगे,बस्तवडे येथील संपर्क दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले हि स्वाभिमानी जनतेची लढाई आहे. मी लढण्याचा निर्णय कागलच्या जनतेसाठी घेतला आहे.ऊमेदवारी जनतेनेच दिली आहे. परिवर्तनाचा पिवळा रंग आपल्या सोबत आहे .जनतेची मला साथ आहे . संपूर्ण राज्याचे लक्ष कागलवर आहे. राजे फाउंडेशन च्या मार्फत या भागात अनेक उपक्रम राबवुन सर्व सामान्य जनतेला आधार दिला आहे .लोकांचे आरोग्य सुधारावे म्हणून प्रयत्न केले आहेत.त्यामुळे मी केलेल्या जनसेवेला आता जनताच न्याय देईल.
यावेळी सुरूपली येथे धुळाप्पा आप्पा खंदाळे,वाय एस पाटील,जी जी पाटील,एच के पाटील,दत्ता मोरे,आनंदराव कांबळे,साताप्पा कमळकर कुरुकली येथे माजी सैनिक वसंत पाटील,उपसरपंच एम जी पाटील,शिवाजी पाटील(नाना), माजी सैनिक जगन्नाथ कांबळे, नारायण शेळके,व्ही के पाटील,भैरवनाथ कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button