कोरोना विषाणूची दुसरी लाटेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग अधिक वाढविला आहे. त्यानुसार 1 मे 2021 पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल (Viral message) होत आहे की, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये. व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे.सध्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मासिक पाळी त महिलांनी लस घेऊ नये.
- मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेतल्यास (covid vaccine during menstruation) त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाळीच्या ५ दिवस आधी किंवा ५ दिवस नंतरच्या कालखंडात लस घेऊ नये,असे सल्ले देणारे मेसेज आणि ग्राफिक्स सोशल मीडियातून व्हायरल होताहेत.ह्यात किती तथ्य आणि सत्यता आहे ते ही पाहणे आवश्यक आहे.
- काय आहे मेसेज..!
- सर्व महिलांसाठी सूचना
लसीकरण झाल्यानंतर येणारा हलकासा ताप, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे प्रतिकारशक्ती कमी झाल्याची नव्हे तर प्रतिकारशक्तीचा लसीला मिळत असलेला प्रतिसाद असण्याची लक्षणे आहेत.
मासिक पाळीच्या काळात प्रतिकारशक्तीवर काहीसा परिणाम होतो हे जरी खरे असले तरीही ती एवढीही खालावत नाही की ज्याची तुलना एड्सग्रस्त व्यक्तीच्या पातळीएवढी होईल. कोरोना प्रतिबंधात्मक लशीकरणासाठी दिलेल्या नियमावलीतही असा विशिष्ठ उल्लेख आढळून येत नाही.
त्यामुळे व्हायरल दाव्यांना खरे मानून मासिक पाळी आली म्हणून कोरोना लसीकरण टाळू नये. लसीकरण, मास्क-सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हेच कोव्हीड पासून वाचण्याचे प्रभावी उपाय आहेत.
डॉ. मुठ्ठे म्हणाल्या की “मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळाली असेल तेव्हा जरूर लस घ्या. तरुण मुली कामानिमित्ताने घराबाहेर पडत असतील कारण सगळ्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नसतं. अत्यावश्यक सेवेत अनेक महिला काम करतात. त्यांची मासिक पाळी केव्हाही सुरू असू शकते किंवा नसू शकते. त्यांची नोंदणी झाली असेल आणि लस मिळत असेल तर त्यांनी जरूर लस घ्यावी.
महाराष्ट्रात कोरोनारुग्णांच्या एकूण संख्येपैकी जवळपास 40 टक्के महिला आहेत. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, कोव्हिडमुळे महिलांच मासिक पाळीचं चक्र बदलतं का?कोरोनामुक्त झालेल्या महिलांमध्ये पाळी अनियमित येणं, पाळी येण्यास उशिरा होणं, रक्तस्राव होण्याचा पॅटर्न बदलणं, खूप जास्त रक्तस्राव होणं अशा तक्रारी आढळून आल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, कोरोनासंसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये इतर वैद्यकीय समस्या दिसून येतात. त्यामुळे पाळीत बदल कोव्हिडमुळे झाला का? याबाबत ठोस सांगता येणार नाही.कोव्हिडनंतर महिलांच्या अंडाशयाला सूज येण्याच्या माहितीची कागदोपत्री नोंद आहे. या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत.
कोरोना संसर्गानंतर अंडाशयाला सूज असेल तर, मासिक पाळी दरम्यान त्रास किंवा बदल होण्याची शक्यता असते.
कोरोना संसर्गात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. काहींना फुफ्फुसाचा त्रास होतो. तर, काहींमध्ये इतर वैद्यकीय समस्या निर्माण होतात.
“कोव्हिडनंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने प्रजनन प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असते पण शक्यतो असे कमी प्रमाणात होते.कारण कोव्हीड चा संबंध हा फुप्फुसांशी निगडित असतो.” असं फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. मुठ्ठे यांनी सांगितले.
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, महिलांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी.
- योग्य आहार, व्यायाम गरजेचा आहे
- शरीराला योग्यवेळी रिलॅक्स केलं पाहिजे
- झोप वेळेवर हवी
- जास्त वेळ बसून काम करू नये. कामातून मध्येच थोडा ब्रेक घ्यावा.