Maharashtra

मंगरूळ ग्रामपंचायत सदस्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

मंगरूळ ग्रामपंचायत सदस्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी)- मंगरूळ ता अमळनेर येथील सरपंच त्यांचे पती व इतर लोकांनी खोटे बातमीपत्र छापून खंडणी मागण्याच्या कृत्याशी आमचा कुठलाही संबंध नसल्याचे 13 पैकी 9 ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे 
        उपसरपंच संजय रामदास पाटील , सदस्य दीपक जगतराव  बागुल , अधिकार विक्रम पाटील , कलाबाई उत्तम पाटील , अल्काबाई भिकन पाटील , तुळसाबाई नगराज  भिल , भटू बोमटू घोलप , चित्राबाई विश्वास पाटील ,सुवर्णा वासुदेव बागुल या 9 सदस्यांनी पत्र दिले आहे की सरपंच  यांचे पती संदीप पाटील यांना ग्रामपंचायत ने कुठलाही अधिकार दिलेला नसतांना देखील त्यांनी परस्पर औद्योगिक  वसाहतीत जाऊन ग्रामपंचायतीच्या हितास बाधा निर्माण करणारे व ग्रामपंचायत ची बदनामी करण्याचे व वरिष्ठ कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या नावाने कुठलेही गैरकृत्य केले असल्यास त्याबाबत योग्य ती कारवाई संबंधित जबाबदार व्यक्तींवर करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत कराबाबत औद्योगिक वसाहतीशी सामंजस्याने तोडगा काढण्याबाबत सरपंच याना सुचवले असता त्यांचे पती संदीप पाटील वारंवार हस्तक्षेप करून औद्योगिक वसाहतीशी विनाकारण वाद वाढवून ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या उत्पन्नाला अडथळा आणत असल्याने त्याबाबत योग्य ती चौकशी होऊन कारवाई होण्याची विनंती गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button