आम आदमी पार्टी जळगाव कडून दिल्लीतील केजरीवाल सरकारचे कौतुक
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आज दिल्ली सरकार कडून २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला, दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे. दिल्लीत मोफत पाणी, शिक्षा आणि स्वास्थ्य सेवा देणारे दिल्ली राज्याचे लाडके मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे धाडशी निर्णय घेतलेला आहे. याबाबत आज आम आदमी पार्टी, जळगाव तर्फे या निर्णयाचे च्या स्वागत करण्यात आले.
केजरीवाल सरकारने दिल्लीच्या आम आदमी साठी केलेली ही मोठी घोषणा आहे. आता दिल्लीमध्ये २०० युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे. दिल्ली राज्यातील जवळपास ३३ लक्ष लोकांना याचा फायदा होणार आहे. भारताच्या संविधानात नागरिकांना मूलभूत सुविधा मोफत देण्याचे सांगितले आहे, त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल हे देशाचे एकमेव नेते आहे. २०१४ मध्ये दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आले तेव्हा दिल्लीतील वीज कंपन्या कंगाल झाल्या होत्या, तेथील इन्फ्रास्ट्रक्चर कमजोर झाले होते, दररोज वीज कपात केल्या जायची, त्यामुळे नागरिकांना इन्वरटर खरेदी करावे लागायचे, परंतु आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर वीज क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली, सर्व कंपन्या आर्थिक दृष्ट्रा सक्षम झाल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. वीज कपात करणे बंद झाले. दुसरीकडे गेल्या चार वर्षात एकदाही दर वाढविण्यात आले नाहीत. उलट आज २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
आता २०० युनिट पेक्षा जास्त ४०० युनिट वीज वापर केल्यास ५० % अनुदान देण्यात येईल.
याचा सविस्तर तक्ता खालीलप्रमाणे आहे. या अगोदर दोन दिवसा पूर्वी दिल्ली सरकार द्वारे रहिवासी ग्राहकांचे फिक्स्ड चार्ज मध्ये १०० रुपये पर्यंत कमतरता केली होती.
आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष रईस खान , महानगर उपाध्यक्ष योगेश हिवरकर, चाळीसगाव तालुका अध्यक्ष तुषार निकम,एरंडोल तालुका अध्यक्ष उज्वल पाटील,अनिल वाघ, योगेश भोई,चाळीसगाव सचिव सचिन राणे, सुखदेव पाटील, नारायण जेठवानी, मीडिया प्रभारी विवेक गुर्जर, ज्ञानेश्वर पाटील डॉ. आशिष जाधव व सर्व विधानसभा प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी दिल्ली सरकारच्या २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याच्या धाडशी निर्णायचे स्वागत व अभिनंदन केलेले आहे.
रईस खान (आप युवा जिल्हाध्यक्ष)
महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यातील सर्वत्र नविन मिटर बसल्याने जनता त्रस्त आहे. वीजबिलात झपाट्याने वाढ झाल्याने लोकांना नवीन मिटर नको आहे. आणि एकीकडे दिल्लीत सरकार 200 युनिट पर्यंत वीज मोफत देत आहे.
योगेश हिवरकर (जळगाव उपाध्यक्ष)
महाराष्ट्रच्या धरतीवर सतत वीजबिल वाढ होत असतांना दिल्लीच्या आप सरकारने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुळात महाराष्ट्रात बीजेपी सरकार व केंद्रात पण बीजेपी सरकार असतांना सुध्दा फडणवीस सरकार वीजबिल वाढ वर अपयशी ठरले आहे







