?मोठी बातमी…लॉक डाऊन वाढला…! 1 जून पर्यंत लागू राहतील निर्बंध..!ही आहे नियमावली…!
मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे ह्या लॉक डावूनचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली. ‘सात लाखांवरील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आता चार लाखांवर आली आहे. तरीदेखील स्थिती आटोक्यात येण्यासाठी लॉकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढवावा अशी चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णयजाहीर करतील. मात्र, एक सूतोवाच मी देत आहे.’ असं म्हणत लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असे स्पष्ट संकेत दिले होते.
त्यानंतर आता महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
अशी असेल नियमावली
- परराज्यातून महाराष्ट्रात येणा-यांना 48 तासा आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक
- महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणा-या RTPCR रिपोर्ट बंधनकारक असणार
- परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो 7 दिवस ग्राह धरणार
- मालवाहतूक ट्रक मध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं प्रवेश
- बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थनानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा
- दूधाच कलेक्शन , वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार
- एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणा-यांना कर्मचा-यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवाशांची परवनागी






