Amalner

Amalner: कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

Amalner: कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

अमळनेर तालुक्यातील लोणचारम येथे गृहकर्ज आणि हात उसनवारीचे कर्ज यावर्षी कसे फेडावे. या विवंचनेतून ३९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ४ रोजी दुपारी घडली. संदीप प्रकाश पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पाडळसरे येथून जवळच असलेल्या लोणचारम येथील शेतकरी संदीप पाटील याने दुपारी १२ वाजेच्या आधी राहत्या घरी बेडरूममध्ये उभ्या भिंतीच्या कडीला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यावर नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यास उतरवत अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. चुलतभाऊ विवेक पाटील यांच्या खबरी वरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास हवालदार भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत. मृत शेतकऱ्याच्या पश्चात वडील, पत्नी, व ६ वर्षाची मुलगी असून त्यांच्याकडे ५ बीघे कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर असलेल्या गृहकर्ज, उसनवारी व इतर कर्जामुळे ते गेल्या काही दिवसापासून नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button