Maharashtra

आशा कर्मचारी बांधकाम कामगारांसह सफाई भरती बाबत पालकमंत्र्यांना साकडे. सीटु राष्ट्रीय उपध्यक्ष ङाॅ ङी एल कराङ यांची मागणी

आशा कर्मचारी बांधकाम कामगारांसह सफाई भरती बाबत पालकमंत्र्यांना साकडे.
सीटु राष्ट्रीय उपध्यक्ष ङाॅ ङी एल कराङ यांची मागणी,

नाशिक जिल्हा प्रतिनिधी. शांताराम दुनबळे

नाशिक-:कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या आशा कर्मचारी व गटप्रवर्तक , बांधकाम कामगार आणि सफाई कर्मचारी ठेक्याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे यासाठी सीटूच्या वतीने निवेदनाद्वारे त्यांना साकङे घालण्यात आले आहे . आशा कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे . या संदर्भात कर्मचाऱ्यांनी ३ जुलैपासून संपावर जाण्याची नोटीस दिलेली आहे . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशा कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले . परंतु , आशा कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्यावर सुपर्विजन करणाऱ्या गटप्रवर्तक यांचे मानधन त्याचवेळी वाढविणे आवश्यक आहे . त्यामुळे आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांचे मानधन वाढीचा योग्य निर्णय एकत्रितपणे करावा , अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ . डी . एल . कराड यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे . राज्यातील बांधकाम मजुरांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यान महामंडळातर्फे लाॅकडाउन काळात दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे . परंतु लॉकङावुन होऊन तीन महिने झाले आहेत व अजूनही बांधकामे पूर्ववत सुरू झालेली नाहोत . त्यामुळे या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना उपासमारीची वेळ आली आहे . बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे भरपुर निधी उपलब्ध आहे . त्यामुळे पुन्हा एकदा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला जावा व याबरोबरच महानगरपालिकेमध्ये आउटसोसिंगच्या माध्यमातून सातशे सफाई कामगार यांची भरती करण्यात येत आहे . सफाईचे काम अत्यावश्यक नियमित व कायम स्वरूपाचे आहे . त्यामुळे आउटसोर्सिंग द्वारे या कामासाठी नोकर भरती करणे गैर व बेकायदेशीर आहे . तसेच सफाचे काम करणारे व्यक्ती या प्रामुख्याने मागासवर्गीय , आदिवासी मेघवाळ अल्पसंख्यांक व गरीब ओबीसी जातीतून येतात . त्यामुळे ठेकेदारी पध्दतीने त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सफाई कामगारांची भरती आउटसोर्सिंगच्या माध्यमातून न करता महापालिकेतर्फे नियमीत स्वरूपात करण्यात यावी , अशी मागणी डॉ . कराङ यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button