?Big Breaking..भारत चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट ; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यता
नवी दिल्ली- भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष झाल्याची माहिती मिळत आहेत. उत्तर सिक्किमच्या के नाकू सीमेवर ही झटापट झाल्याचे सांगितलं जात आहे. या संघर्षामध्ये चीनचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना हा संघर्ष झाल्याने चिंता वाढली आहे.
विशेष एक दिवसापूर्वीच दोन्ही देशामधील तणाव कमी करण्यासाठी तब्बल 17 तास चर्चा झाली होती. एका मराठी न्यूज चॅनेलने यासंबंधी वृत्त दिले असून भारतीय लष्कराने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.






