संपूर्ण वीज बिल माफ करा मनसेची मागणी
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरातील कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण अर्थचक्र थांबले, लोंकांच्या हाताला काम नाही, जनता प्रचंड अडचणीत सापडली आहे,त्यामुळे शेती आणि घरगुती चे संपुर्ण वीज बिल माफ करण्याची मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलिप बापू धोत्रे यांनी केली आहे.
कोरोनाच्या या महाभयंकर संकटामुळे गेले चार माहीने सर्व नागरिक घरात बसून आहेत,,अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत, अशातच विजवितरान कंपनीने भरमसाठ वीज बिल पाठवली आहेत,, नागरिक चिंताग्रस्त असताना हे नवीन आर्थिक संकट ओढवले आहे, लोकांना दिलासा देण्यासाठी वीज वितरण कंपनीने वीज बिल माफ करावे अशीं मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे, जर वीजबिल माफ केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे, यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,प्रशांत गिड्डे,शशिकांत पाटील, सिद्धेश्वर गरड इत्यादी उपस्थित होते.