Amalner: ओबीसी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करून न्याय दिल्याबद्दल आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिनंदन व मानले आभार…मांडला 32 गावांचा अतिवृष्टी नुकसान भरपाई प्रश्न…
अमळनेर येथील आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या ज्वलंत प्रश्न ओबीसी आरक्षण बाबत शासन स्तरावरून योग्य पाठपुरावा करून न्याय मिळवून दिल्याबद्दल लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे माजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी ,धनंजय महाजन ,बाळासाहेब संदानशिव,पंकज चौधरी,दीपक चौघुले यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेत त्यांचे अभिनंदन करत आभार मानले.
तसेच अमळनेर तालुक्यातील मारवाड मंडळ येथील 32 गावांना 2019 साली जुलै व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई न मिळाल्याने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवाना तात्काळ इतर मंडळातील शेतकरी बांधवाना 20 हजार 400 एवढे (सानुग्रह) भरपाई मिळाली त्याच धर्तीवर मारवाड मंडळ मधील 32 गावातील शेतकरी बांधवाना भरपाई मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री साहेब यांचा कडे केली आहे.तात्काळ या बाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्री फडवणीस साहेब यांनी दिल आहे.