उडीद,मुग आदि पिकांचा पंचनामा करा…माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील
रजनीकांत पाटील
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आज अखेर ६१० मि.मी.पेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन गेल्या दुस-या आठवड्यापासुनच्या सतत पर्जन्यमानामुळे येणा-या खरीप हंगामातील उडीद,मुग आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन शेतकरी हवालदिल झालेले आहेत.बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करुन जिल्हाधिकारी कार्यालय,जळगांव,आयुक्त कार्यालय,नाशिक यांचे मार्फत शासनास सादर करावा.यासाठी मा.जिल्हाधिकारी जळगांव यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक – जि अ कृ अ/ ने.आ./पंचनामा/३१४५ दिनांक २१ आॅगस्ट २०२० च्या धर्तीवर मा.तहसिलदार अमळनेर व पारोळा यांना आदेश व्हावेत,अशी मागणी
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.