आदिवासी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
उलगुलान उलगुलान उलगुलान
हर जुल्म,शोषण,अत्याचार खिलाफ
उलगुलान जारी राहेगा..
वनवासी नहीं हम आदिवासी है..
देश के मूलनिवासी है..
प्रा जयश्री साळुंके
आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला.त्यांच्या आईचे नाव करमी हातु व वडीलांचे नाव सुगना मुंडा असे होते .
त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्याने समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.
बिरसा लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे व चपळ होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण सलगा या गावातील त्यांच्या मावशीकडे झाले .पुढे ते मिशनरी शाळेत चाईसाबा येथील जी. सी. एल. मिडल स्कूल मधून त्यांची उच्च माध्यमिक परीक्षा पास केली . बिरासांना येथेच मिशनऱ्यांच्या दुष्ट्चक्रांबद्दलचा पहिला अनुभव आला .मिशनरी आदिवासींचे शोषण करतात म्हणून त्यांनी मिशनरी शाळा सोडून दिली. आणि त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले .
१८९ ० -१८९४पर्यंत ते बंद्गाव येथेच राहिले ,पुढे त्यांचा विवाह हिराबाई नावाच्या कन्येशी झाला परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला .
बिरसा मुंडा ते भगवान बिरसा _ बिरसांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य यांची सुद्धा आवड होती .ते उत्तम बासुरी वाजवायचे, त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला .ते रानात गुरे चरायला नेत . त्यामुळे निसर्गात उपलब्ध असलेल्या वनऔषधीबद्दल चांगलेच ज्ञान होते ,ते आजारग्रस्त लोकांना विशिष्ट प्रकारची जडीबुटी देवून त्यांचा आजार बरा करत असत . म्हणूनच लोक त्यांना ‘भगवान बिरसा’ म्हणू लागले . एकदा पावसाळ्यात कडाडती वीज बिरसांवर पडली. परंतु बिरसांना कसलीही इजा झाली नाही, याउलट त्यांच्या आजूबाजूची झाडे विजेमुळे खाक झाली . या घटनेपासून इंग्रजही आश्चर्यचकित झाले व “बिरसा god है” असे ते मानू लागले,व तसे त्यांनी नमूदही करून ठेवले आहे .
बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्याने केला. बिरसा मुंडाने गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.
_सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या शोषणाची सीमा पार केली होती . आदिवासी जमिनीचे मूळ मालक असूनही जमीनदार व सावकार जबरदस्तीने त्या जमिनीवर ताबा मिळवून बसले होते . पण त्याबद्दल चकार शब्दही न काढण्याचा आदेश इंग्रजांनी दिले होते,परंतु बिरासांना ते सहन झाले नाही बिरासांनी लोकांमध्ये जागृती करण्यास सुरवात केली ,ते लोकांना म्हणत कि “तुमच्या जमिनी धूळ वाऱ्यासारख्या उडून गेल्या आहेत,स्वभिमानासोबत तुमचा आत्मविश्वासही संपला आहे,जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत जागृत नाही केला तर तुम्ही तुमच्या आया बहिणींची अब्रु कशी वाचवाल …… ?”या वाक्यांचा लोकांच्या मनावर खोल परिणाम झाला . व लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होण्यास सुरवात झाली.
बिरसा मुंडा याला लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.बिरसाचे सन १८८६ ते १८९० या काळात चैबासा येथे वास्तव्य होते. हा कालावधी जर्मन आणि रोमन कॅथोलिक ख्रिश्चन आंदोलनासाठी ओळखला जातो. त्यामुळे सुगन मुंडा यांनी शाळेतून आपला मुलाचे-बिरसाचे-नाव काढून घेतले होते. चैबासा हे तत्कालीन सरदारांच्या राज्याच्या राजधान्यांपासून फार दूर नव्हते. सरदारांच्या आंदोलनांत इंग्रज शिपायांनी बिरसाला अशा प्रकारे पकडले की त्याच्यावर धर्मविरोधी आणि सरकारविरोधी शिक्का मारला गेला. १८९० मध्ये चैबासा सोडून दिल्यानंतर बिरसा आणि त्याचे कुटुंबाने जर्मन मिशनचे सदस्यत्व सोडून दिलेली. सरदारांच्या विरोधात आदिवासी ख्रिश्चन होऊ लागले आणि त्यामुळे भारत छोडो आंदोलनाबरोबरच बिसा मुंडा त्याच्या मूळ पारंपरिक आदिवासी धार्मिक व्यवस्थेकडे वळला.
बिरसा यांनी आपल्या जीवनात नंतरच्या एका टप्प्यावर एकाग्रतावर भर दिला. बिरसा शेतकर्यांमधील सर्वात कमी दर्जाच्या गुलाबांमधून उगवला, जो त्यांच्या नावे इतरांपेक्षा वेगळा होता, मुंदारी खुंटकट्टी व्यवस्थेमध्ये फारच कमी अधिकारांचा आनंद घेतात; संस्थापक वंशाच्या सदस्यांनी सर्व विशेषाधिकारांचे एकाधिकार केले होते, परंतु शेती-उत्पादकांपेक्षा ही रित्या चांगली नव्हती. नोकरीच्या शोधात ठिकाणाहून चालत असलेल्या लहान मुलाच्या रूपात बिरसाचा स्वतःचा अनुभव, त्याला शेतीविषयक प्रश्न आणि वनविषयक बाबींमध्ये अंतर्दृष्टी देण्यात आली; तो निष्क्रिय नसलेला प्रेक्षक होता परंतु अतिपरिचित चळवळीत सक्रिय सहभागी होता.
सन १८६९मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला,त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली . आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्द बिरासांनी १८९०मध्ये व्यापक क्रांती ‘उलगुलान ‘ची घोषणा केली . शस्त्रबळ तयार करून शत्रूंना ठार केले .
सन १८७५ मध्ये ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !’हि लोकमान्य टिळकांची घोषणा देशभरात पोचली पण नव्हती ,त्याही आधीपासून बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रजी सत्तेला आवाहन केले होते हे इतिहासातील खूप मोठे सत्य किती जणांना माहित आहे … ?
बिरसांनी १८९५मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले,जंगल,जमीन संपत्ती हा आमचा अधिकार आहे ,ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे ,यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले . त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले . यामुळे इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. बिरसांनी अनेक अनुयायी तयार केले. बिरसा व त्यांच्या अनुयायांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. हि बातमी पोलिसांनी जिल्हाधिकार्याला कळवताच बिरासांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले . ९ ऑ. १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. आणि ख्रिस्ती पाद्रींच्या साक्षीवरून त्यांना २ वर्ष कारावास व ५० रु. दंड ठोठावण्यात आला.
३० नोव्हे. १८९७ रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले ,त्या वेळी आदिवासी समाजाची केविलवाणी स्थिती बघून ते पेटून उठले व त्यांनी स्वावलंबन व स्वाभिमानासाठी उलगुलान ची घोषणा केली.
बिरसा हे उत्तम योद्धा होते.एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले,नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले. फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले.
जाने. १९०० मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकाऱ्यांना बिरासांच्या या हल्ल्याची माहिती मिळाली आणि जाने. १९०० मध्ये ११. वाजता इंग्रजांनी डुंबारी बुरुजावर गोळीबार सुरु केला, तेव्हाच बिरासांचे अनुयायी त्यांच्या नावाचा जयजयकार करत धनुष्यबाण व दगडफेक करत त्यांचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. त्यावेळी टेकडीवर २०००पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपस्थित होता,यात स्त्रिया व लहान मुलांचाही समावेश होता. या नरसंहारात २००पेक्षा जास्त आदिवासी मारले गेले,व बाकीच्यांना जबरदस्तीने ख्रिश्ती धर्म स्वीकारण्यात भाग पाडले गेले. हा नरसंहार ‘डुंबारी बुरुज नरसंहार’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
या नरसंहारानंतर ७जाने. १९००मध्ये पोलिसांनी धरपकड सुरु केली, व पुढे ३फेब्रु. १९००मध्ये बिरसांनी आपल्या ८० अनुयायांसमवेत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळेस तेथे उपस्थित आदिवासी बांधवांना बिरासांनी माधारी फिरण्यास व आपल्या अधिकारांसाठी लढण्याचा उपदेश केला.
त्यानंतर वयाच्या केवळ २५व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना कॉलाराने ग्रस्त होवून बिरासांची प्राणज्योत मालवली. परंतु येथेही इंग्रजांचे कपट दिसून येते,बिरासांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना तुरुंगात कॉलराच्या औषधाऐवजी विष देण्यात आले होते.
बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ पारंपरिक आदिवासी धार्मिक व्यवस्थेचा पाठपुरावा करण्यास सल्ला दिला. त्याच्या शिकवणींनी प्रभावित होऊन आदिवासी लोकांना तो एक संदेष्टा बनला आणि त्यांनी त्यांचे आशीर्वाद मागितले.नारा मोरे, बोकारो स्टील सिटी, झारखंड येथे नबेंदु सेन यांची बिरसा मुंडा पुतळा बिरसा मुंडाचा नारा ब्रिटिश राज-अबू राज सेटर जन, महाराणी राज तुंडू जन (“राणीचा राज्य संपुष्टात येऊ द्या आणि आमचे राज्य स्थापन होऊ द्या”) यांना धमकी देत आहे – आज उडीसा, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रदेशांमध्ये याद आहे. प्रदेश.
ब्रिटिश औपनिवेशिक व्यवस्थेने आदिवासी कृषी व्यवस्थेस सामंतिक स्थितीत रूपांतरित केले. आदिवासींनी त्यांच्या मूळ तंत्रज्ञानामुळे अधिशेष निर्माण करू शकले नाही, म्हणून छोटानागपुरमधील प्रमुखांनी आदिवासींना शेतकरी स्थापन करण्यास व शेतकरी म्हणून नियुक्त करण्यासाठी आमंत्रित केले. यामुळे आदिवासींनी घेतलेल्या जमिनींचा विपर्यास झाला. थाकाडर्सची नवीन वर्ग अधिक दडपशाही प्रकाराची होती आणि त्यांची बहुतेक मालमत्ता बनविण्यास उत्सुक होती.
कृषी विस्कळीत आणि संस्कृतीच्या बदलाच्या दोन आव्हानांना, बिरसा यांनी मुंडेसह त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्रोह आणि विद्रोहांच्या मालिकेतून प्रतिसाद दिला. मुंद्यांच्या जमिनीचा खरा मालक म्हणून, आणि मध्यस्थ आणि ब्रिटिशांना निर्वासित करण्याचा हक्क म्हणून आंदोलन करण्याची मागणी केली गेली.
आज त्याच्या नावावर अनेक संस्था, संस्था व संरचना आहेत, विशेषत: बिरसा मुंडा विमानतळ रांची, बिरसा इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी सिंधरी, बिरसा मुंडा वानवासी छत्रवस, कानपूर, सिद्धो कान्हो बिर्षा विद्यापीठ, पुरुलिया आणि बिरसा कृषी विद्यापीठ. बिहार रेजिमेंटचे युद्ध रोख म्हणजे बिरसा मुंडा की जय (बिरसा मुंडाचा विजय). 2008 मध्ये, बिरसाच्या जीवनावर आधारीत हिंदी चित्रपट, गांधी से पेहेल गांधी यांना त्याच नावाने त्यांच्या कादंबरीवर आधारित इक्बाल दुर्रान यांनी निर्देशित केले होते. आणखी एक हिंदी चित्रपट, “उलुलन-एक क्रांती (द क्रांती)” 2004 मध्ये अशोक सरन यांनी तयार केली, ज्यामध्ये 500 बिरसाईट्स किंवा बिरसाच्या अनुयायांनी अभिनय केला.
बिरासंच्या ‘उलगुलान’ ला हि बिरसाइतकेच महत्व प्राप्त झाले,उलगुलान मध्ये समाजहीत तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणे आदि तत्वे समाविष्ट आहेत ,म्हणूनच लोक बिरासांना धरती आबा म्हणून संबोधतात.
आजही या महानव्याक्तीच्या पवित्र स्मृती झारखंड राज्यात आहेत. झारखंड राज्याने रांची airport व रेल्वे स्थानकाला ‘बिरसा मुंडा’ हे नाव देवून त्यांच्या महान कार्याला गौरविले आहे.






