Maharashtra

?️खेड्यातील वातावरण कोरोना साठी घातक ठरू शकते

?️ खेड्यातील वातावरण कोरोना साठी घातक ठरू शकते

सुशांत गौरवे

बारामती

1. गावातले लोक आजहि वट्यावर बसुन दिसतात. तेहि 05ते 10 लोक एकत्र बसलेले दिसतात.
2. गावात बाहेर गावाहुन आलेले (पुणे मुंबई व इतर) गावात सगळीकडे फिरत आहेत.
3. दारू पिणारे लोक आजही गावातल्या आजु बाजुच्या गावात जात आहे. कुठूनही ब्लॅक मध्ये दारू आणून पित आहेत त्यानिमित्ताने एकत्र येत आहेत पिण्याकरिता.
4. जे मुके जणावर चारणारे लोक आजही ते सोबत 5 ते 7 जण सोबत चारायला जात आहे.
5. काही लोक किराणा व भाजीपाला आण्यासाठी आज हि 2विलर वर 3 लोक सोबत जात आहेत. आणि ऑटो मधे 4 ते 5 जण सोबत जात आहेत.
6. चौका चौकात आजही लोक बसुन दिसतात 5 ते 10 जण.
7.गावात आजही पत्ते खेळत आहे. ग्रुपमधे.
8.मुल आजहि गावातल्या चौकात किंवा गावशेजारील शेतामध्ये लुडो खेळत आहे. 4 जण खेळणारे 10 जण पाहिणारे.
9.गावात घरातले जेवढे लोक आहे ते आपल्याला नुसार बाहेर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी बसत आहे. वट्यावर , शिवला स्टँड वर
10 आजूबाजूच्या गावात आजही लोक कामाला जात आहेत.

..तालुका लेवल वर लोक जात आहे. पुणे मुंबई वरून येणारे बाहेर फिरत आहे. आता 1 ते 10 मुद्या यापैकी जर कोरोना आणला तर काय होईल. अस असल तर किती जणांना कोरोना लागन होऊ शकते. जर असच चालू राहील तर पुर्ण गावाला कोरोना लागन होऊ शकते.
म्हणून विनंती करतो का घराच्या बाहेर जाऊ नका. अतिशय महत्वाचे काम असेल तर बाहेर पडा
11 महत्व वाचा मुद्या .खेड्यातला तो तमुकजी वट्यावर बसुन आहे. तो बीस्ताना स्टँड वर बसुन आहे तो फिरत आहे. मग मि का घरात बसु मि चालो बाहेर अस चालते गावात . तर अस करू नका घरात रहा. खुप लोक ग्रामीण भागात एकमेकांच्या संपर्कात येत आहे तर कोरोना होण्याची शक्यता जास्त आहे.

शहरी भागातले लोक कोरोना साठी आवश्यक ति काळजी घेत आहे.
1. काम असेल तरच बाहेर पडत आहे. 2. भाजीपाला किंवा किराणा आणायला 1व्यक्ती बाहेर जात आहे. आणि परत आल्यावर हात धुणे. जी काळजी घ्यायची आहे ते घेत आहे.
3.बाकीचे घरातच राहत आहे.
4.लोकांच्या संपर्कात येत नाहीत .

आपले गावातले लोक पुर्ण गाव फिरून घरी येत आहेत

कृपया काळजी घ्या माझ्या गावकाऱ्यांनो एक लक्षात ठेवा, आपल्यामुळे आपल्या गावाची वाईट अवस्था होऊ नये येवढेच केल तरी खुप मोठी समाज सेवा व देश सेवा घडेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button