Maharashtra

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात भात आवणी साठी पाऊसाची दाडी, ठराविक ठिकाणीच पाऊस पडतोय शेतात गाळ तयार करायला कसरत.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात भात आवणी साठी पाऊसाची दाडी,
ठराविक ठिकाणीच पाऊस पडतोय, शेतात गाळ तयार करायला कसरत.

प्रतिनीधी दिलीप आंबवणे

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात पावसाने ठराविक ठिकाणी दांडी मारली आहे त्यामुळे अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भात लागवडीसाठी लागणारा गाळ तयार झाला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ओढ्या नाल्याचे पाणी वळून शेतामध्ये गाळ करण्यासाठी उपायोजना करावे लागत आहेत त्यामुळे पहिलेच उन्हाळ्यामध्ये झालेल्या चक्रीय वादळामुळे हिरड्यांची नुसकान आणि त्यामध्ये आता पर्यंत भात लागवड म्हणजेच आदिवासी शब्दांमध्ये भाताची अवनी ही पंढरपूरची यात्रा या दिवसापर्यंत होत असते मात्र जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी पावसाने आदिवासी भागांमध्ये ठराविक ठिकाणी दांडी मारली आहे दरवर्षाप्रमाणे पाऊस पडला नाही त्यामुळे आदिवासी बांधवांना भात आवणीसाठी चिखल करयला हा त्रास सहन करावा लागत आहे काही ठराविक ठिकाणी त्यामध्ये भीमाशंकरचा परिसरात पाटणच्या परिसरात पाऊस पडला आहे पण भोइरवाडी तिरपाड कोंढरे आंबडे माळीन अडीवरे पंचाळे या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात होईल त्यामुळे लोकांनी अवणीला सुरुवात केली आहे पण म्हणावं तसं पाऊस नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे तसेच आदिवासी भागात जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुद्धा दरवर्षीप्रमाणे उभा राहत असतो अजून पर्यंत जनावरांच्या तोंडामध्ये म्हणावा तसा चारा उपलब्ध झाला नाही हिरवा चारा खाण्यासाठी जनावरांची तारांबळ होत आहे पावसाने दरवर्षाप्रमाणे यावर्षी आदिवासी भागाकडे दुर्लक्ष केलेल्या दिसत आहे
यामध्ये डोंगर दर्‍यांमध्ये राहणारा आदिवासी बांधव हा अनेक गोष्टींपासून आतापर्यंत वंचित राहिला आहे पण शासन म्हणावे तसे लक्ष देत नाही अधिकारी म्हणत असा अभ्यास करून या भागाचा विकास कायापालट करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेत नाही काही ठिकाणी चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे मात्र हा ठराव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे प्रत्यक्ष प्रत्येक गावांमध्ये कृषी विभागाने आदिवासी बांधवांना भात लागवड करण्यासाठी यंत्र उपलब्ध करून दिले पाहिजेत अनेक यंत्र बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत मात्र ती यंत्र आदिवासी भागातील लोकांना सबसिडीवर उपलब्ध करून दिली तर आदिवासी माणसं बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अनेक वेळा आदिवासी माणूस पिढ्यान पिढ्या सुरू असलेली शेती मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करताना दिसत नाही यामध्ये असे लक्षात येते की आदिवासी बांधवांना प्रबोधन केले जात नाही अधिकारी मात्र आदिवासी बांधवांच्या साठी खूप काही करत आहे असं भासवत आहे मात्र प्रत्यक्षात प्रगति काही नाही
अजून पर्यंत चक्रीय वादळामध्ये झालेल्या नुसकान भरपाई मिळाली नाही त्यामध्ये असे लक्षात येते की आदिवासी बांधवांची सात 12 वर हिरड्याच्या झाडांच्या नोंदी नाहीत. त्यामुळे आदिवासी भागातील महसुली गावात तलाठी त्यांनी स्वतः पाहणी करून झाडांची नोंद केली पाहिजे अशी मागणी आदिवासी बांधवांच्या वतीने होत आहे अनेक वेळा असं होतं की तलाठी हे फक्त काही ठराविक लोकांना भेटून माहिती घेतात आणि शासनाला ती माहिती पाठवून देत असतात त्यामुळे खरा आदिवासी नुसकान भरपाई पासून वंचित राहतो असं समोर येत आहे यावर्षी सुद्धा बळीराजा आदिवासी शेतकरी याला येणाऱ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button