रावेर

सर्व नागरिकांना सावदा पोलीस स्टेशन कडून आवाहन

सर्व नागरिकांना सावदा पोलीस स्टेशन कडून आवाहन

मुबारक तडवी

येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडून पुढील काही दिवसात निकाल अपेक्षित आहेत. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची *सर्वोच्च न्याय व्यवस्था* आहे. त्याच्यावर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या *निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप,फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया,पत्रकबाजी टीकाटिपणी देणे* हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तरी नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे.

➡ जमाव करून थांबू नये.
➡ सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
➡ निकालानंतर गुलाल/अबीर उधळू नये.
➡ फटाके वाजवू नयेत.
➡ सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.
➡महाआरती अथवा समूह नमाज पठण याचे आयोजन करू नये.
➡ निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत
➡ घोषणाबाजी जल्लोष करू नये.
➡ मिरवणुका रॅली काढू नये.
➡ भाषण बाजी करू नये.
➡ कोणतेही वाद्य वाजवू नये.धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
➡ कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये..

सदरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ *जागेसंदर्भातील निकाल* असेल.

तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहिता कलम
➡ *कलम 295* कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे
➡ *कलम 295 (अ)* कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे
➡ *कलम 298* धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे
याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल.
* तरी सर्व नागरिकांना *शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे*

*आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष्य अाहे*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button