सहकारी संस्था कशा चालवाव्या यांचा आदर्श श्रीराम शेटे यांच्याकडून घ्यावा – खासदार शरद पवार
दिंडोरी – सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
कादवा कारखाना मातेरेवाडी येथे असावी सह डिस्टिलरी प्रकल्पाचे आज शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले त्यावेळी
साखर उद्योग अनेक अडचणींचा सामना करत असताना कादवा हा छोटासा कारखाना मात्र श्रीराम शेटे यांच्या स्वच्छ पारदर्शी कारभाराने कादवा सुस्थितीत सुरू आहे. त्यांनी वेळीच निर्णय घेत इथेनॉल प्रकल्प अल्पावधीत सुरू करून आदर्शवत काम केले असून राज्यातील सहकारी संस्था कशा चालवाव्या याचा आदर्श श्रीराम शेटे यांचेकडून घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केले. मी अध्यक्ष तर शेटे उपाध्यक्ष असुन सहकार व साखर कारखाना सह सर्व च पंचायत समिती जिल्हा परिषद कामे पार पाडली
कादवा सहकारी साखर कारखान्याचे असावणी ( डिस्टिलरी) इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे हस्ते झाला त्यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री छगन भुजबळ माजी खासदार देविदास पिंगळे आमदार माणिकराव कोकाटे नितीन पवार दिलीप बनकर नरेंद्र दराडे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रवींद पगार गणपतराव पाटील दत्तात्रय पाटील सदाशिव शेळके संजय पडोळ आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना पवार यांनी साखर उद्योग नेहमीच अडचणीतून मार्गक्रमण करत आहे देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याने साखरेला उठाव नाही अशा स्थितीत कारखाने मोठ्या अडचणी आलेले आहे जगात केवळ साखर निर्मिती नाही तर साखरेपासून विविध उपपदार्थ इथेनॉल बनवले जात आहे ते आपणही करावे यासाठी आपण प्रयत्न केले त्यास केंद्र सरकारनेही मान्यता देत चालना दिली व श्रीराम शेटे यांनी वेळीच इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला कमी वेळेत हा प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पामुळे पुढील काही वर्षात शेतकऱ्यांना निश्चित किमान शंभर रुपये तरी जादा भाव मिळणार आहे. श्रीराम शेटे यांच्या कामकाजाचे कौतुक करताना त्यांनी महाराष्ट्रात कादवा असा एकमेव कारखाना आहे की तेथे चेअरमन व संचालक यांच्यासाठी गाडी नाही त्यावरूनच येथील कामकाज लक्षात येते तसेच कोणतीही उपपदार्थ निर्मिती नसताना कारखाना सुस्थितीत ठेवत त्याचे विस्तारीकरण करत शेतकऱ्यांना चांगला भाव दिला आहे आज सहकार क्षेत्र टिकवायचे असेल तर श्रीराम शेटे यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे यावेळी केंद्र सरकारवर टीका करताना शरद पवार यांनी आज जगात आपल्या देशाची प्रतिष्ठा आपल्या पंतप्रधानांनी वाढवली असे सांगितले जाते त्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु बांगलादेश सारखा देश आमचे द्राक्ष घेणार नसला तर ती प्रतिष्ठा काय कामाची असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी धाडसी निर्णय घ्यावे असे आवाहन केले. जगात सध्या उसापासून हायड्रोजन निर्मितीचे प्रकल्प सुरू झाल्याचे ऐकत आहे त्याची आम्ही सविस्तर माहिती घेत आहोत जर हा प्रकल्प यशस्वी होत असला तर तो आपल्या देशातही राबविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे पवार यांनी सांगितले.
बोलताना माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्रीराम शेटे यांच्या कामकाजाचे कौतुक करत यांचा आदर्श इतर सहकारी संस्था चालवणाऱ्यांनी घ्यावा असे सांगितले तसेच राज्य सरकार चे काय चाललेय ते कळत नाही भाजपने फतवा काढत फक्त भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या शिफारशी असलेल्या नवीन सहकारी संस्था नोंदणी करण्याचा घाट घातला आहे हे अयोग्य असून या विरोधात आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेबाबत चुकीच्या कामकाजामुळे बँक अडचणीत आल्याचे सांगत कानपिचक्या दिल्या.नारपारचे भरपूर पाणी आहे ते गुजरात ऐवजी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा सध्याच्या सरकारकडून जास्त अपेक्षा नाही कारण दिल्लीश्वरांनी जर डोळे वटारले तर आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काहीच करू शकणार नाही मात्र वातावरण बदलतंय विविध माध्यमांच्या सर्वे मध्ये भाजपला फटका बसत सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत मिळत आहे तरी सर्वांनी त्यासाठी कामाला लागावे असे सांगितले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कादवाच्या आदर्श कामकाजाची राज्यभर चर्चा असल्याचे सांगितले तसेच जिल्हा बँक कर्जाबाबत शेतकरी अडचणीत आले असून त्यांचेसाठी राष्ट्रीयकृत बँक प्रमाणे ओटीएस योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले.प्रास्ताविक करताना चेअरमन श्रीराम शेटे यांनी कादवाची वाटचाल विषद करत कादवा कशामुळे वाचला याचे मर्म सांगितले. विस्तारीकरण करण्यास परवानगी मिळाली नाही पण शरद पवार साहेब यांनी आपल्याला आधुनिकीकरण करण्याचा सल्ला दिला त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण कामकाज केल्याने व संचालक मंडळ सभासद यांच्या सहकार्याने कादवा यशस्वी वाटचाल करत असून इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याचे स्थैर्य व ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळणार असल्याचे सांगितले.शेतकरी जिल्हा बँकेच्या कर्जामुळे अडचणीत आले आहे त्यांना दिलासा द्यावा असे आवाहन केले.
यावेळी श्रीराम शेटे यांचे अमृतमहोत्सवी वाढदिवस निमित्त लोकनेता गौरव विशेषांकाचे प्रकाशन पवार यांचे हस्ते झाले. आभार संचालक सुकदेव जाधव यांनी मानले यावेळी सर्व संचालक,शेतकरी अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत. सूत्रसंचालन सुरेश सलादे,अशोक शिंदे यांनी केले.
तांबेना पुढे घ्या
कादवा चे इथेनॉल प्रकल्पाचे शुभारंभ राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते झाले त्यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे काहीसे मागे उभे होते त्यांना बघत पवार यांनी तांबे यांना पुढे घ्या असे म्हटले त्यावर आमदार माणिक राव कोकाटे यांनी घेतले साहेब त्यांना पुढे म्हटले तर इतरांनी साहेब त्यांना खूप बहुमताने आपण पुढे घेतले असे सांगितले.
इडी ची वक्रदृष्टी गिरणावर
माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपणही गिरणा कारखाना चालवायला घेतला होता पण इडी ने सर्वात अगोदर त्यावर वक्रदृष्टी टाकत अजूनही त्यांची वक्रदृष्टी त्याचेवर आहे ती वक्रदृष्टी निघाली की आपण श्रीराम शेटे यांचे मार्गदर्शन घेत गिरणा चालवू असे सांगितले.
श्रीराम शेटे झाले भावूक
श्रीराम शेटे यांनी कादवा चांगल्या स्थितीत चालवला व त्यांचे उपपदार्थ निर्मितीचे स्वप्न होते आज इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाल्याचा आनंद असतानाच श्रीराम शेटे हे भाषण करताना भावूक झाले. यावेळी कादवाचे सर्व सभासद बंधू भगिनीं व कर्मचारी यांच्या जोरावर आपण हे बहुमताने काम करीत असुन सभासद व सर्व हितचिंतकांचे स्वागत व ही मानले
क्षणचित्रे
यावेळी मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ही महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नां नरहरी झिरवाळ यांचे बरोबर फोटो घेणार्या चाहत्यांकडून लाईन लागले ने त्यांच्या आगामी लोकप्रियता दाद मिळालेले इतरांना चलबिचल करायला लावणारे असुन त्यांनी आपल्या मनमोकळेपणाने पवार साहेब व शेटे साहेब यांच्या बाबत स्तुती केली व प्रलंबित कामांसाठी मोठ्या साहेबांचे नेहमी च लक्ष घातले आहे व घालतील असे सांगितले






