Chalisgaon

पोलीस यंत्रणा व अकार्यक्षम १०८ अंबुलन्स चा संताप जनक प्रकार

पोलीस यंत्रणा व अकार्यक्षम १०८ अंबुलन्स चा संताप जनक प्रकार

चाळीसगाव मनोज भोसले

या पोस्टद्वारे सर्वाना विनंती करण्यात येते की जर रस्त्यावर कोणाचा अपघात झाला असेल पोलीस प्रशासन व अंबुलन्स ची वाट न बघता तात्काळ जखमींना आपल्याकडून शक्य होईल त्या मदतीने तात्काळ हॉस्पिटलला न्यावे.

‘संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब शिरसाठ व समस्त संभाजी सैनिक यांच्या धावपळीला व मदातकार्याला अखेर यश वेळेत उपचार मिळाल्याने अपघातातील सर्व गंभीर जखमी सुस्थितीत

पोलीस यंत्रणा व अकार्यक्षम १०८ अंबुलन्स चा संताप जनक प्रकार

दि ८/१०/२०१९ रोजी चाळीसगांव येथून पंढरपूर येथे नियोजित मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकीस जाण्यासाठी बापूसाहेब शिरसाठ व आम्ही जात असतांना वाटेत रात्री ३:०० वाजता औरंगाबाद-अहमदनगर हायवेवर नगरच्या 12 किलोमीटर अलीकडे धनगरवाडी जवळ खोल नाल्यात एक अपघातग्रस्त कार दिसली त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता बहुतेक पावसामुळे किंव्हा झोपेची डुलकी लागल्यामुळे ती कार खोल नाल्यात झाडावर आदळली असेल त्या गाडीत 3 जण होते नवरा बायको व 5 वर्षाचा मुलगा तो प्रसंग एवढा भीषण होता की त्यावेळी गाडीत ड्रायव्हर असलेली ती व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होती व ती महिला त्या धसक्याने सुन्न अवस्थेत होती व मुलगा मात्र जोरजोरात ओरडत होता किंचाळत होता..त्या वेळी त्याच्या आवाजाने रात्रीच्या शांततेत किर्रर्र अंधारात हृदय फाटेल एवढी भीषणता होती..आम्ही परिस्थिती चा अंदाज बघत प्रथम त्या वाहनापर्यंत गेलो व लॉक झालेली गाडीचे दरवाजे तोडून त्या तिघांना बाहेर काढले समोरील दृश्य बघून आम्ही देखील धास्तावलो गाडी चालवणारी व्यक्ती गंभीर जखमी होती व त्या मुलाचा व आईचा हंभारडा जीवाची घालमेल करणारा होता त्यावेळी त्या दोघांना बापूसाहेबांनी धीर दिला व आम्ही आहोत तुमच्यासोबत काळजी नका करू आम्ही बघतो पुढे काय करता येईल ते असे बोलून प्रथम शासकीय हेल्पलाईन 108 अंबुलन्स ला कॉल केला तेव्हां असे कळले की अहमदनगर मध्ये 108 हेल्पलाईन ची अंबुलन्स कार्यन्वित नाही मग अहमदनगर पोलीस स्टेशन ला कॉल केला तर समोरील ठाणे अंमलदार बोलतात की ती आमची हद्द नाही आम्हाला कॉल करू नका एम आय डी सी पोलीस स्टेशन कॉल करा तेथेदेखील कॉल केला तर तेथील ठाणे अंमलदार बोलले की प्रायव्हेट अंबुलन्स करा व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करा आम्ही। सकाळी पंचनामा करू. तोपर्यंत जखमी तरुनाचा खूप रक्तश्राव झाल्याने तो बेशुद्धावस्थेत होता त्यास तात्काळ उपचाराची आवश्यकता होती तेव्हा क्षणाचाही विलंब न करता बापूसाहेबांनी निर्णय घेतला की आपल्या स्कॉर्पिओ गाडीत जखमी तरुनास व त्याच्या परिवारास
घेऊन तात्काळ शासकीत दवाखान्यात उपचारासाठी घेऊन चला भर पावसात आमच्या सर्व संभाजी सैनिकांनी त्यांना गाडीत बसवून बाकी काही कार्यकर्ते गाडीला लटकून कारन गाडीत तेव्हां त्यांना घेतल्या मुळे जागाच शिल्लक नव्हती त्याही अवस्थेत कशाची पर्वा न करता गाडी सुसाट वाऱ्याच्या वेगाने शासकीय दवाखान्यात नेऊन जखमीला उपचारासाठी दाखल केले परंतु तेथील उपस्तीत डाँक्टरानी सांगितले की पेशंट ची अवस्था गंभीर आहे तुम्ही तात्काळ प्रायव्हेट हॉस्पिटल पेशंट ऍडमिट करा तेव्हां मग बापूसाहेबांनी स्वखर्चाने प्रायव्हेट अंबुलन्सने पेशंट अहमदनगर येथील विघनहर्ता हॉस्पीटल येथे दाखल केले पुढील उपचार सुरू केला..व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना सदरील घटनेची माहिती दिली व त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलला पोहचेपर्यंत आम्ही सर्व संभाजीसैनिक व बापूसाहेब शिरसाठ हॉस्पिटल मधेच होतो. जेव्हा डॉक्तरांनी सांगितल की जखमी पेशंट आता धोक्याच्या बाहेर परंतु जर अजून फक्त 10 मिनिटे लेट झाले असते तर परिस्तिथी गंभीर झाली असती.
तेंव्हा मात्र उपस्थित जखमींच्या नातेवाईकांनी बापूसाहेब यांचे आभार मानून धन्यवाद देत रडत होते..

तेंव्हा मात्र आम्हालादेखील आनंद झाला की पंढरपूर ला जात असताना वाटेतच आम्हाला विठ्ठल पावला.

सदर लेख लिहण्याचे एकच कारण की अपघात ग्रस्त जखमी रुग्णाची मृत्यूची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे व जास्त रुग्ण हे वेळेत उपचार न मिळाल्याने दगावतात..
तरी सर्वाना विनंती की आपल्या नजरेत जर एखादे अपघात झालेला असेल तर त्यास शक्य होईल त्या वाहनाने लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यावे जेणेकरून त्यास वेळेत उपचार मिळतील..आता तर सुप्रीम कोर्टाने देखील आदेश दिले आहे की अपघातात मदत करणाऱ्याची कुठलीही चौकशी होणार नाही तरी माणुसकीच्या नात्याने शक्य होईल ती मदत करावी ही विनंती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button