राजपुतांबाबत अपशब्द काढल्या प्रकरणी धनंजय देसाई विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल
गणेश ढेंबरे संभाजी नगर
औरंगाबाद : औरंगाबाद संभाजीनगर राजपूत समाजाच्या (जातिच्या) भावना दुखावल्या प्रकरणी धनंजय देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करुण अटक करणे बाबत “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख देविचंदसिह बारवाल यांनी औरंगाबाद संभाजीनगर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.
धनंजय देसाई यांनी भाषणात भडकावु राजपुताची प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न केला. देसाई यांनी राजपूत जातिवर कसलेही पुरावे नसतांना असत्य आणि खोटे आरोप केले आहे. त्यांनी समाजात दंगल घडवुन आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे राजपूत समाजाचा (जातिचा) अपमान झाला असे तक्रारीत नमुद आहे.
राजपूत होते म्हणून हिंदूधर्म वाचला अन्यथा 500 वर्षांपूर्वी हा देश इस्लाम राष्ट्र झाले असते, हिंदूचे अराध्य दैवत राणा सांगा, बाप्पा रावळ, महाराणा प्रतापसिंह जी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रसाल बुंदेला, पृथ्वीराजसिंह चौहाण, यांनी राजपूत जातिमध्ये जन्म घेतला त्या जातिवर चिखलफेक करणे अयोग्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज, सुद्धा राजपुत शिसोदिया वंशज आहे. कोणी विसरता कामा नये. राजपूत हा धर्म रक्षक, राष्ट्र रक्षक होते म्हणून आज हिंदू धर्म जिवंत आहे असे देविचंदसिह बारवाल म्हणाले.