Amalner

अमळनेर: दुकानातून घेतलेल्या वस्तूचे पैसे मागितले म्हणून दुकानदाराचे तोडले बोट..!

अमळनेर: दुकानातून घेतलेल्या वस्तूचे पैसे मागितले म्हणून दुकानदाराचे तोडले बोट..!अमळनेर येथील किराणा दुकानांत घेतलेल्या वस्तूंचे पैसे मागितले म्हणून राग येऊन दुकानदाराला मारहाण करण्याची घटना घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, रवींद्र गोविंदराम सैनानी यांच्या गांधलीपुरा भागातील किराणा दुकान आहे. या दुकानात पैलाड येथील रोशन राजेंद्र पाटील , यशवंत प्रकाश पाटील, विजय राजेंद्र पाटील हे तिघे दि 11 डिसेंबर रोजी रात्री दारू पिऊन दुकानात आले. त्यांच्या हातात बियरची काचेची बाटली होती. त्यांनी पाण्याची बाटली, कुरकुरे आणि सिगारेट घेतली. पैसे न देताच ते तिघे तेथून निघून जात असताना दुकानदार रवींद्रने दिलेल्या वस्तूंचे पैसे मागितले. त्याचा राग येऊन तिघांनी त्याच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी शेजारील दुकानदार रवींद्रचा भाऊ मनोज सैनानी आवरायला आला असता तिघांनी त्याला देखील शिवीगाळ व मारहाण केली.अचानक त्या तिघांमधील रोशनने हातातील बियरची बाटली रवींद्रच्या कपाळावर मारली. दुकानात घुसून दुकानाच्या मालाचे नुकसान करून दुकानातून निघून जात असताना रवींद्रने
यशवंतचा शर्ट पकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने खिश्यातील धारदार चाकू काढून मधल्या बोटावर मारल्याने मधल्या बोट तुटले. मनोज सैनानीने दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध भा दंड संहिता कलम 326,323,504,510,427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे कॉ सुनील हटकर करीत आहेत.अमळनेर: दुकानातून घेतलेल्या वस्तूचे पैसे मागितले म्हणून दुकानदाराचे तोडले बोट..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button