पृथ्वी माझा गुरू,वृक्ष कल्पतरू” असे म्हणत शिक्षकांनीं विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी
अमळनेर सरस्वती विद्या मंदिर येथे “पृथ्वी माझा गुरू,वृक्ष कल्पतरू” असे म्हणत शिक्षकांनीं विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी केली.
गुरुपौर्णिमेचे निमित्ताने यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुंबद्दल मनोगत व्यक्त केले.गुरू चे जीवनातील स्थान याबाबत शिक्षक परशुराम गांगुर्डे, सौ.संगीता पाटील, सौ.गीतांजली पाटील आदिंनी माहिती दिली.तर मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्यासह शिक्षक आनंदा पाटील,धर्मा धनगर, ऋषिकेश महाळपूरकर,मदतनीस संध्या ढबु आदिच्याहस्ते यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सहभाग घेतला.







