Pune

? रणधुमाळी  ग्रामपंचायची   : जिल्ह्यतील 81 ग्रामपंचायत बिनविरोध

? रणधुमाळी ग्रामपंचायची : जिल्ह्यतील 81 ग्रामपंचायत बिनविरोधपुणे : ल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामधील 81 ग्रामपंचायती पूर्णतः,14 ग्रामपंचायती अशतः बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आता 650 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 4 हजार 904 जागांसाठी 11 हजार 7 उमेदवार रिंगणात असून, 127 जागांसाठी अर्जच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे त्या जागा रिक्त आहेत. तर 8 हजार 778 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनानेही तयारी केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 डिसेंबर हा शेवटाचा दिवस होता. त्यादिवसांपर्यंत 21 हजार 771 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छानानीत 296 उमेदवारांचे 443 अर्ज बाद झाले. तर 21 हजार 374 उमेदवारांचे 21 हजार 623 अर्ज वैध ठरले होती. यंदा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात आली. मात्र, त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने आगोयाने प्रत्यक्ष अर्ज स्विकारण्याची परवानगी दिली. त्यामुळे उमेदवारांची अतिम माहिती प्रसिद्ध करण्यास विलंब झाला.निवडणुकीमुळे गावात वाद नको, म्हणून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न स्थिनिक नेत्यांनी केला आहे. त्याला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतीपैकी 81 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध निघाल्या आहेत. तर 14 ग्रामपंतचायती या अशतः बिनविरोध निघाल्या आहेत. तर पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावातील नागरिकांनी रस्त्याचे कामे न झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.आता जिल्ह्यातील प्रत्यक्षात 650 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 2031 प्रभागांतील 4 हजार 904 जागांसाठी निवडणूक होत असून, त्यामध्ये 11 हजार उमेदवार रिंगणात आहेत. तर 2049 जागा या बिनविरोध निघाल्या आहेत.127 जागा या रिक्त असून, त्याठिकाणी अर्ज प्रप्त झाले नाहीत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यत 8 हजार 778 उमेदवारांनी माघार घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button