Latur

वृक्षारोपण करून वैवाहिक जीवनाची सुरुवात; 21 झाडे लावत केला विवाह

वृक्षारोपण करून वैवाहिक जीवनाची सुरुवात; 21 झाडे लावत केला विवाह
लातूर : आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करत असताना वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्याने प्रेरित होऊन औसा तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी प्रा. निलेश क्षीरसागर आणि मोनिका भोजने यांनी 21 विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देणाऱ्या अनोख्या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात चांगल्या उपक्रमाने व्हावी या हेतूने प्रा. निलेश क्षीरसागर व निका भोजने यांनी 21 झाडांची लागवड करून पर्यावरण संरक्षण काळाची गरज हा संदेश दिला. या नवदाम्पत्याने स्वतः श्रमदान करून खड्डे केले. शिवाय, वड, पिंपळ, आंबा, चिंच, कडुनिंब अशी 21 पर्यावरण पूरक झाडे लावली. सध्या कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना पटले आहे. झाडांकडून आपण सर्वजण मोफत ऑक्सिजन घेतो त्यामुळे झाडे लावून ती जगविली पाहिजेत हा संदेश देण्यासाठी या नवंदाम्पत्याने पुढाकार घेतला आहे.
केवळ वृक्षारोपण करून हे हे नवंदाम्पत्य थांबणार नसून दोघे मिळून ही लावलेली झाड जगविणार असल्याचा निर्धार त्यांनी केला. वसुंधरा प्रतिष्ठानच्या गत सहा वर्षातील कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे यावेळी प्रा. निलेश क्षीरसागर यांनी सांगितले. उपस्थित प्रत्येक पाहुण्यांना एक रोप भेट देऊन झाड जगवावे असे आवाहन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button