हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले सावधानतेचा इशारा
जळगाव हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण पाण्याने भरले आहे.परिणामी आज सकाळी धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज तापी नदीपात्रात 45803 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
पुढील 24 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या परिसरातील गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही गुटेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.






