Ahamdanagar

लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी केला लोकवर्गणीतून शिवरस्ता, आमदाराच्या गावातील शेतकऱ्यांचा पराक्रम

लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी केला लोकवर्गणीतून शिवरस्ता, आमदाराच्या गावातील शेतकऱ्यांचा पराक्रम

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी कासारपिंपळगावा तील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत वारंवार आव्हाने रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली. परंतु अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रशासनाकडून अवहेलनाच झाली.पावसाळ्यात शेतकऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत या रस्त्यावर कधीच प्रशासनाने डांबरीकरण केले नाही.दरवर्षी या रस्त्याच्या नावाने बोगस बीले काढून रस्ता कागदावरच पुर्ण केला जात असे. गेल्या वर्षी फक्त साडेचारशेमिटरचा रस्ता थातुरमातुर डांबरीकरण केला.पण परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. मग गावातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून हा रस्ता तयार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे,संदिप राजळे,गणेश भगत यांनी पुढाकार घेऊन या भागातील शेतकरी एकत्र केले.नारायण भगत,अरविंद भगत,गंगाधर म्हस्के, संतोष जगताप, चिमाजी म्हस्के,अर्जुनआबा राजळे,रोहित मुरदारे,नानाभाउ भगत,शुभम भगत,संभानाना राजळे,अक्षय दिक्षित ,ढगेसाहेब,यांच्या सह अनेक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर, ट्राली या रस्त्याच्या कामासाठी मोफत दिले,आणि कासारपिंपळगावातील,आव्हाने-हनुमान टाकळी हा पावणेदोन कि.मी.चा शिवरस्ता स्वखर्चाने तयार करून लालफितीचा कारभार असलेल्या प्रशासनाला जोरदार चपराक दिली आहे. संपूर्ण शेतकरी एकत्र आल्यावर कशी क्रांती घडवून येते हे कासारपिंपळगावातील शेतकऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दाखवून दिलं आहे.गावात कारभार करणाऱ्या पुढाऱ्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button