Amalner: गावांच्या नावांचे फलक लावा.. मनसेचे बस आगार प्रमुखांना निवेदन…
अमळनेर बस स्थानकावर फलटावर गावांचे नाव टाकून त्यासमोर गाडी लावावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगार प्रमुख यांना देण्यात आले. अमळनेर येथील बस स्थानकावर फलटावर गावाचे नावाच नसल्यामुळे बस बेशिस्त लागत असल्याने त्यामुळे प्रवासी सैरावैरा फिरतात. एखादी बस आवारात आल्यावर वेड्यासारखे प्रवासी व विद्यार्थी गाडीच्या मागे पडत सुटतात आणि ड्रायव्हर साहेब यांना गाडीत कुठे जाते? ही गाडी आता जाईल का? परत जाईल का थांबेल? की दुसऱ्याकडे लागेल? असे प्रश्न विचारतात या गर्दीत लहान मुले व म्हाताऱ्या लोकांच्या प्रश्न निर्माण होतो यामुळे एखादा दिवशी अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगार प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन बस स्थानकावर फलटावर गावाचे नाव टाकून बस त्यासमोर शिस्तीत लावावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करावे लागेल. निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे शहराध्यक्ष सुनील भाऊ पाटील (भाऊसो) (रस्ते आस्थापना) शहर संघटक भास्कर ठाकरे महेंद्र सैंदाणे राहुल महाजन वार्ड अध्यक्ष सोनुभाऊ पाटील भावेश महाजन सागर सैंदाणे दीप मराठे व मनसे सैनिक उपस्थित होते