Maharashtra

लोकसहभागातून जलसंधारणाचा अभिनव आदर्श उपक्रम

लोकसहभागातून जलसंधारणाचा अभिनव आदर्श उपक्रम
पहिल्याच पावसात १४ कोटी लिटर पाणी साठोपा झाला तयार…

प्रतिनिधी सोमनाथ माळी

५६ दिवसात अविरतपणे पोकलॅड मशिनच्या माध्यमातून झालेल्या नाला खोलीकरण व रुदीकरण कामामुले करोडो लिटर जलसाठा होणार निर्माण..
*ब्राम्हणशेवगे* ता. चाळीसगाव
येथे *शिवनेरी फाऊंडेशन भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर पाणी* साठा उपक्रमाद्वारे *रोटरी क्लब, मुबई व सेवा सहयोग संस्था, पुणे* याच्या माध्यमातून मिळालेल्या पोकलॅन्ड मशीनद्वारे लाॅकडाऊन असल्याने कुठलाही गाजावाजा न करता व शेतकरी बाधवाच्या शेतीच्या बांधालगत असलेल्या मातीबांध खोलीकरण व रूदीकरणाचे काम मा. उज्वल कुमार चव्हाण जाईन्ड डायरेक्टर (ई.डी), सॉफ्टवेअर ईजि.गुणवंत भाऊ सोनवणे व तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण,पाणपाटील
तुषार निकम,शेखर निंबाळकर,पंकज पवार,शशांक अहिरे,एकनाथ माळतकर, सचिन राणे, सविता राजपूत (नगर सेविका), आरस्ता माळतकर,प्रा.आर.एम.पाटील,रविंद्र वाघ,हेमंत मालपुरे,प्रा.एम डी देशमुख, दयाराम सोनवणे
*यांनी ६ महिने प्रशिक्षण घेऊन गावागावात नालाखोलीकरण + रुंदीकरण करण्यासाठी टीम उभारल्यात.त्या होणाऱ्या कामालाच नाव दिले, ‘मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा’*
यांच टिमच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी याचे अथक प्रयत्नांमुळे दि.१७ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन १० जून २०२० दरम्यान ५६ दिवसात रोटरी क्लबच्या माध्यमातून ३७ दिवसात ४२० तासात १०८५२० घनमिटर काम झाले यातून पहिल्याच पावसात चक्क दहा कोटी पंचाऐशी लाख विस हजार लिटर पाणी साठोपा निर्माण झाला आहे. तर सेवा सहयोग संस्थेमार्फत १९ दिवस २०५ तासात ३१५६० घनमिटर काम होऊन तीन कोटी लिटर पाणी साठोपा एका पावसात होणार आहे.ब्राम्हणशेवगे व नाईकनगर शिवारात तब्बल ५६दिवस ६२५ तासात १४००८० घनमिटर काम होऊन एका पावसात १४ कोटी ८० हजार लिटर पाणी साठोपा निर्माण झाला आहे. या कामासाठी शेतकरी बांधवांनी सहा लाख पंचवीस हजार रुपयाचे डिझेल लोकसहभागातून टाकले.तसेच या कामामुळे २०० ते२५० विहिरीची पाणी पातळी पहिल्याच पावसात झपाट्याने वाढली आहे.
या जलसंधारणाच्या सातत्यपुर्ण सुरू असलेल्या कामामुळे गावातच नव्हे तर संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात उच्चांकी काम झाले.कारण संपुर्ण जग कोरोना च्या पार्श्वभूमीवर घरात असताना येथील शेतकरी भारावल्यागत स्वतः आपल्या खिशातून आर्थिक बिकट परिस्थिती असतांना कधी हात उसणे तर कधी व्याजाने पैसे काढून आपल्या शेतालगत असलेल्या माती बांध खोलीकरण व रूदीकरण करून घेण्यासाठी डिझेल टाकून ऊभा राहून तांत्रिक पणे स्वतः ईजिनिअर प्रमाणे कुठल्याही शासकीय मदतीची वाट पाहत न बसता कोरोनाचे संकट बाजूला सारुन आपल्या शेतालगतचे काम आपले स्वतःचे काम समजुन रात्रदिवसाची तमा न करता झपाटल्यासारखं प्रत्येकाने काम करून घेतले. कुठलाही हेवा नाही मान पाण नाही.राजकारण नाही. त्यामुळे ब्राम्हणशेवगे येथे न भुतो न भविष्यती असे उच्चांकी व आदर्श घेण्यासारखे काम उभे राहिले आहे. तसेच शेतात जाण्यासाठी व येण्यासाठी शिवरस्ताही लोकसहभागातून करुन घेतला आहे.या कामाचे शासकीय मुल्ये पाहिले तर खर्च अगदी लाखात तर काम करोडो रुपयांच्या घरात तर जलसाठा ही करोडो लिटर झाला आहे.शेतकरी राजाला जगाचा पोशिदा का म्हणतात हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.आपल्या शेतालगतचा लोकसहभागातून नाला खोलीकरण,रुदिकरन,शेत रस्ता स्वतः शेतकरी करणे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे. अतिशयोक्ती वाटेल पण हे वास्तव आहे. याचा पाचशे हेक्टर शिवारातील शेतकरी बाधवाना फायदा होणार आहे. ब्राह्मणशेवगे , नाईकनगर या गावात झालेला जलसाठा हा शाश्वत आणि चिरकाल पाणी प्रश्न मिटविणारा आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button