Maharashtra

पालकांनो, आपल्या पाल्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा न बनता गूगल बना – अमित राठी

पालकांनो, आपल्या पाल्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा न बनता गूगल बना

– अमित राठी

फैजपूर ( प्रतिनिधी )

बालक, पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून समाजाला पोषक वातावरण तयार होत असून आपल्या पाल्याची आवड निवड समजून त्यांना करियर ची दिशा द्यावी. मुलांचा कल जाणून प्रोत्साहन दिल्यास भारताला सक्षम नागरिक आणि वसुंधरेला रक्षणकर्ता मिळेल. यासाठी प्रत्येकाने डी एम आय टी चाचणी करून घेऊन आपल्या पाल्याचा बुध्यांक आणि करियर विषयक कल जाणून घ्यावा असे आवाहन तापी परिसर विद्या मंडळ संचालित

धनाजी नाना महाविद्यालय येथे करियर गायडन्स आणि डी एम आय टी सेमिनार प्रसंगी राष्ट्रीय वक्ता अमित राठी यांनी केले.

दिनांक १६ जून २०१९ रविवारी श्रद्धेय लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा जन्मदिवस. कै बाळासाहेब यांचे महाराष्ट्राच्या शिक्षण आणि समाज क्षेत्रातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्मार्ट स्किल, नाशिक आणि धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जून सकाळी १० ते १ वाजे दरम्यान सेमिनार हॉल , धनाजी नाना महाविद्यालय येथे करियर गायडन्स आणि डी एम आय टी सेमिनार आयोजित करण्यात होता. सेमिनार साठी राष्ट्रीय वक्ता आणि देशभरात ज्यांनी ३०० हुन अधिक सेमिनार यशस्वी करून दाखविले आहेत असे डी एन आय टी चाचणी करून समुपदेशन करणारे मा अमित राठी यांनी कला , वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील दहावी आणि बारावी नंतर करियर च्या विविध संधी  ध्येय निश्चिती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणि आत्मविश्वास कसा वाढवावा यासंबंधी मार्गदर्शन दृक श्राव्य साधनांच्या माध्यमातून सादरीकरण केले. हा सेमिनार इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थी आणि पालकांसाठी होता यात  विशेष करून डी एम आर टी या शास्त्रीय बुध्यांक मापन शास्त्रीय पद्धतीवर भर देण्यात आला. ही पद्धत चार वर्ष वयापासून पुढील मुलांसाठी लाभदायक असून बुध्यांक व्यक्तिमत्त्व, योग्य करियर ची निवड, शिकण्याची पात्रता, ए टी डी प्रतिसाद देण्याची वेळ, मेंदूच्या कार्यशैली बद्दल विषसत्वे वापरण्यात येते. सेमिनार साठी  विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेमिनार चे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी यांनी केले. त्यांनी सेमिनार च्या आयोजनामागील हेतू आणि या संबंधी विवेचन करून कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे महाराष्ट्राला लाभलेले वैभव आणि कार्यकर्तुत्व यावर भाष्य केले.

यानंतर श्रध्देय मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात शिरीष दादा चौधरी यांनी बालकांच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत पालकांच्या सिंहाचा वाटा असतो त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार मुलांनी वागण्याचा हट्ट न करता त्यांच्या कलेने त्यांना आयुष्य जगू द्या. कामाचा आनंद मनापासुन घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी पालकांनी शंकांचे निरसन करून घेतले.

सेमिनार ला तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा शिरिषदादा चौधरी, मा शेखर पाटील, उपाध्यक्ष मा श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन मा श्री लिलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव मा प्रा एम टी फिरके, मा प्रा पी एच राणे, सौ अरुणाताई चौधरी, धनंजय चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा वंदना बोरोले, प्रा डॉ राजश्री नेमाडे, प्रा कविता भारुडे, मिलन महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

एन सी सी अधिकारी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी केले. यावेळी पालक सन्मा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, श्री नितिन सपकाळे, श्री शेखर महाजन, श्री चेतन इंगळे, श्री प्रकाश भिरुड, पराग राणे, एन सी सी कडेट्स आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button