पेठ- प्रतिनिधी शैलेश राऊत
गेल्या किती दिवसापासून प्रजन्य अतिवृष्टी चालू आहे त्यामुळे पेठ तालुक्यात विजेचा पुरवठा बंद करण्यात आला होता आणि आता वीजपुरवठा चालू केला तेव्हा बोरवठ गावातील डीपी जळाली आहे तर गेल्या एक आठवड्यापासून ग्रामस्थांची लाईट नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे व तेथील शासकीय आश्रमशाळा तीन दिवस झालेत स्वयंपाक करण्यासाठी कर्मचारी पाणी डोक्यावर वाहत आहेत त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी वायरमन याना सम्पर्क त्यांचा होणाऱ्या गैरसोय बद्दल सांगितले आणि तुम्ही लवकरात लवकर डीपी दुरुस्त करून वीजपुरवठा चालू करा म्हणजे लोकांची व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही तर करंजाळी सबस्टेशनचे वायरमन यांनी उडवाउडवी चे उत्तर दिली







