लोणंद शहरातील नगरपंचायत खेळतीया नागरिकांच्या जिवाशी खेळ गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने आंधळ दळत कुत्र पीठ खातय अशी अवस्था
त्यामुळे स्वच्छ लोणंद सुंदर लोणंद फक्त कागदावरच
लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील संगम हॉटेल ते दीक्षित यांचे घर या परिसरातील नगरपंचायत गटर रेल्वेच्या इमारतीचे बांधकाम चालू असल्याने बंद झाले आहे शहरामध्ये बंदिस्त गटाची कामे सुरू आहे तर या वार्डात बंदिस्त गटार का नसावे आणि रेल्वे प्रशासन नगरपंचायत प्रशासन हे गटाच्या बॉर्डरवर आहे त्यामुळे दोन्ही प्रशासन आंधळ्याची भूमिका घेतल्याने परिसरातील ग्रामस्थांना कुटुंबांना दुर्गंधीयुक्त वातावरण रोगराईला निमंत्रण असल्याने या ज्वलंत प्रश्न कुणी लक्ष देत नाहीत याप्रकरणी नगरपंचायत कार्यालयामध्ये महिला मंडळाने अनेक वेळा तात्पुरती डागडुजी करण्यात आली आणि घरामध्ये काही इमारतीमधील संडासचे पाणी येत असल्याने या परिसरात नगरपंचायत चा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या महिन्यामध्ये पाणीप्रश्नी काही संघटनांनी नगरपंचायत वरती मोर्चा काढला होता तरी प्रशासन जागे झाले नाही. झोपी गेलेल्या प्रशासनाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल या भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि कामचुकार कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई रामचंद्र भोसले यांनी वेळोवेळी तक्रारी नगरपंचायत कर दिल्या होत्या परंतु केराची टोपली दाखवल्याने फक्त मतदान आले की ग्रामस्थांची आठवण होती एवढे मात्र नक्की आहे.
सांडपाणीही गटारामुळे दुर्गंधी दिवसात दिवस वाढत आहे याची सखोल चौकशी 15 दिवसात व्हावी अन्यथा नगरपंचायत व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीमती सीताबाई भोसले यांनी दिला आहे