Usmanabad

चालु बसचा नट बोल्ट निखळला.. बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला..

चालु बसचा नट बोल्ट निखळला..
बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला..

उस्मानाबाद प्रतिनिधी:- प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:- कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गौर कडुन कळंब कडे जाणा-या बस क्रमांक (एम एच २० बी एल ०७८८)ही चालु गाडी धावत असतानी नट निखळुन पडल्यामुळे पाटे सरकले..व गाडीचा तोल जाऊ लागला.अचानक घडलेल्या प्रकारामुळे बस चालकाच्या सावधानतेमुळे पुढील अनर्थ टळला.चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लाऊन गाडीवर ताबा मिळवला.
गाडीचा बिघाड झाल्याचे कळंब आगारला कळविले.रोजच्या सवय प्रमाणे वरच्या वरी भागवा भागवीची उत्तरे आली.परंतु कळंब आगारामध्ये विशेष बस गाडीची देखरेख करण्यासाठी व्यवस्था असताना,नट फिटींग,सर्विसींग का केली जात नाही ? हा प्रश्न पडतो.
ग्रामीण भागातील महत्वाची येण्या जाण्यासाठी सोय म्हणजे बस….लालपरी होय
कळंब आगार विभागामार्फत सोडण्यात येणा-या बसेस खास करुन ग्रामीण भागात सोडलेल्या गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत.कधी टायर फुटते,कधी ब्रेक फेल होते.कधील नट बोलट गळुन पडतात.अश्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
गौर मुक्कामी असणारी बस कळंबकडे दहिफळ मार्गे जात असताना गाडीच्या समोरील पाटेचा मुख्य नटबोल्ट तुटुन पडला.चालु गाडी असताना हि घटना घडली.बस चालक शिवाजी मते यांनी प्रसंगावधान ओळखुन गाडीवर ताबा मिळवला मोठा अनर्थ टळला.गाडीचा बिघाड झाल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागेल.स्वतः बसचालक व कंडक्टरने गावातील गॅरेजवर जाऊन लागणारे साहित्य आणून गाडीचे पाटे व्यवस्थित बसवले.नट बोल्ट फिट केले.कळंब आगार नेमके काय करते ? स्वतंत्र बसची दुरुस्ती करण्यासाठी फीटर विभाग आहे.शेकडो मेकॅनिक आहेत.तरी गाडीचा घोटाळा होतोच कसा हे कळायला मार्ग नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button