Mumbai

?आताची मोठी बातमी… महाराष्ट्रातील लॉकडाऊन 10 जून पर्यंत वाढवला..!काही निर्बन्ध शिथिल होण्याची शक्यता…

?आताची मोठी बातमी… महाराष्ट्रातील लॉकडाऊन 10 जून पर्यंत वाढवला..! काही निर्बन्ध शिथिल होण्याची शक्यता…
मुंबई कोरोनाची सद्य स्थिती पाहता 10 जूनपर्यंत लॉक डावूनची ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी अशी चर्चा काल मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत लवकरच घोषणा करतील.असे सूत्रांनी सांगितले आहे.
काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत.आधी ही कार्यालये 25% क्षमतेने सुरू होती. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button