Maharashtra

रावेरात सात दिवसांचा जनता कर्फ्यु लागू होणार

रावेरात सात दिवसांचा जनता कर्फ्यु लागू होणार….

प्रतिनिधी विलास थाटे

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने सात दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याचे प्रशासनाला साकडे घालून विनंती केली असता, सोमवार पासून कडक ‘जनता कर्फ्यु’ पाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

येथील तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची पालिकेच्या नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना होत असताना, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गर्दीला आटोक्यात आणून कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी बुधवारी महत्वपूर्ण चर्चा झाली.यात शहरातील किराणा दुकानासह पेट्रोल पंप सुद्धा बंद

यात सोमवार दि.१३ पासून रविवार दि १९ जुलै पर्यन्त ‘जनता कर्फ्यु’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रसंगी पालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे अधिकारी उपस्थित होते. तर उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, गटनेते असिफ मोहंमद, ॲड.सुरज चौधरी, यशवंत दलाल, असदुल्ला खा.शारदा चौधरी, कलीम मेंबर,

आयुबखा पठाण यांनी नगरसेवकांच्या सहया असलेले निवेदन दिले. तसेच यावेळी

माजी नगरसेवक शिरीष वाणी सर, ऍड. योगेश गजरे, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना अग्रवाल हे सुद्धा उपस्थित होते,
त्यानुसार जनता कर्फ्यु पाळण्यासाठी प्रशासना कडून हिरवा कंदील मिळाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button