?️अमळनेर कट्टा..4 वाजेपर्यंत 68% मतदान..!किरकोळ वाद वगळता कुठेही अनुचित प्रकार न होता मतदान प्रक्रिया शांततेत ..!
अमळनेर तालुक्यातील 67 ग्राम पंचायतींची मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 68% मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे. तसेच किरकोळ वाद वगळता कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी अजून मतदान होईल असेही त्यांनी सांगितले.
अजून 5.30 पर्यंत शेवटच्या टप्प्यात मतदान जास्त प्रमाणात होईल.अशी अपेक्षा आहे. काही मतदार हे विशिष्ट गोष्टींची वाट पाहत असतात.त्यामुळे संध्याकाळी अजून 20 ते 25% मतदान होऊ शकते.त्यामुळे साधारण पणे 75 ते 80% मतदान होऊ शकेल.आज रात्री उशिरापर्यंत योग्य आणि परिपूर्ण माहिती प्राप्त होईल.प्रत्येक ग्राम पंचायत ची शेवटची व्यक्ती आणि मतदान पेटी जोपर्यंत जमा होत नाही तसेच माहिती संकलित होत नाही तोपर्यंत पूर्ण आकडा देणे शक्य नाही.






