चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
आमचे मित्र श्री चंद्रजित राजपूत मालेगाव येथून नाशिक येथे कार ने जात असताना पिंपळगाव जवळ अपघात झालेला होता, अपघातात मालेगाव येथील अनोळखी मुस्लिम दाम्पत्य होते ,महिलेला गंभीर जखमी अवस्थेत त्यांनी आपल्या गाडीत नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये तपासणी करिता नेले ,तिच्या डोक्याला30टाके पडले, मुस्लिम दाम्पत्याजवळ मोजकेच पैसे असल्या मुळे आहे साहेबांनी त्यांना आर्थिक मदत केली व ते निघून गेले। दि 4 सप्टेंबर2019रोजी अचानक काही मुस्लिम बांधव मालेगाव येथील तहसील कार्यालयात आले ,व तहसीलदार साहेबांचा सत्कार केला व त्यांना केलेली
आर्थिक मदत परत केली, साहेबांनी त्यांना सांगितले मी संकटात मदत केली आहे मला परत नको,त्यावेळी त्या बाईच्या पती ने सांगितलेे जर माझी परिस्थिती परत करण्याची नसती तर ते मी परत केले नसते ,सत्काराची बाब सांगण्याची नसून जाती धर्मा पलीकडे जाऊन भारतात मानवता जिवंत आहे हेच मला सांगायचे आहे ,माझ्या मित्राचा मला सार्थ अभिमान आहे