शिवरायांचा जन्म तर्कशुद्ध संशोधन सत्यता
संपादकीय प्रा जयश्री दाभाडे
गेले अनेक दशके महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने साजरी करायची याबाबत वाद-प्रतिवाद केले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेस झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने यावरही अनेक मत-मतांतरे आहेत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या तारखेबाबत वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात.
शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला.
वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात.
एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी.
- सभासद बखर – जन्म तारखेची नोंद नाही.एक्याण्णव कलमी बखर – वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे कि १५४९ / १५५१ असे आहे ह्या बाबत सांशकता आहे) क्षयणाम संवत्सरी
- चिटणीस बखर – शके १५४९ प्रभाव नाम संवास्तरे वैशाख शुद्ध २ गुरुवार
- मराठी साम्राज्याच्या छोटी बखर – १५४९ क्षयनामसंवास्तरे माहे वैशाख शुद्ध ५ चंद्रवासरी
- शिवदिग्विजय – शके १५४९ प्रभाव संवत्सर वैशाख शुद्ध २ गुरुवासरे
- शिवाजी प्रताप- तीस शके १५४९ रक्ताक्षी नाम संवास्तरे
- शेडगावकर भोसले बखर – शके १५४९ प्रभावनाम संवत्सरे फसली सन १०३७ मिती वैशाख शुद्ध ३ रोजी शनवार
- पंतप्रतिनिधी बखरीत – शके १५४९ शके प्रभाव नाम संवत्सर वैशाख शुद्ध १५ इंदुवार
- न्यायशास्त्री पंडितराव बखर – शालिवाहन शके १५४९ प्रभावनामे संवत्सरे
दुसरा प्रवाद – १६३० सालच्या जन्माचा आहे.
- जेधे शकावली-शके १५५१ शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्या त्रितीय शुक्रवार (१९ फेब्रुवारी १६३०) नक्षत्र हस्त घाटी १८ पळे ३१ गड ५ पळे ये दिवसी
- शिवापरकर देशपांडे वहीतील शकावली- शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्या ३ शुक्रवार
- forbes collection – जेधे शकावली सारखेच..
- कवींद्र परामानंदांच्या अनुपुरण – शालिवाहन शके १५५१
- शुक्लानाम सवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्या तृतीयेला रात्री…
- शिवराम ज्योतिषी यांनी केलेली शिवाजी महाराजांच्या कुंडली नुसार – संवत १६८६ (शके १५५१) फाल्गुन वद्या :
शुक्र उ. घाटी ३०/९ राजा शिवाजी जन्म :
र. १०/२३ ल. ४/२९.

?? अश्याप्रकारे वेगवेगळी मत मतांतरे आहेत.
एकंदर सर्वांचा अभ्यास करतांना इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे यांच्या मतानुसार
निव्वळ जन्म तिथी बाबत काय उल्लेख आलेला आहे हे ग्राह्य न पकडता त्या संदर्भात इतर उल्लेखही तपासून त्यांची ग्राह्यता किंवा आग्रह्यता तपासावी.
इ.स. १६२७ सालचा जन्म बऱ्याच ठिकाणी देण्यात आलेला आहे. मूळ चिटणीस बखरीतील जे वर्णन आलेले आहे त्या नंतरच्या बखरकारांनी कमी जास्त प्रमाणात तेच वर्णन उचलून
धरलेले आढळते.
?? तर्कशुद्ध संशोधन
जाधवराव (जिजामातांचे वडील) इ.स. १६२१ मध्ये निजामशाही सोडून मोगलांकडे गेले. दरम्यान सन १६२३ ला ते शहाजहानच्या बंडात सामील होऊन मलिक अंबरकडे काही
दिवस खुर्रमचा हस्तक म्हणून होते. पण तिथे खंडागळेचे प्रकरण उद्भवले त्यात जाधवरावांचा मोठा मुलगा मारला गेला व शहाजीराजेंचा सर्वात वडील चुलत भाऊ संभाजीही मारला
गेला. तेव्हा शहाजीराजे चुलत भावाच्या मदतीस गेले असता जखमी झाले. ह्या प्रकरणा मुळे जाधावारावांना परत खुर्रमच्या
गोठ्यात परतावे लागले. त्यानंतर ते १६२९ला परत आले. या दरम्यान भातवाडीच्या लढ्यात (इ.स. १६२४-१६२५) शहाजी
महाराज आणि जाधवरावांचा आमना सामना झाला असावाशीही शक्यता राहत नाही कारण जाधवराव त्या वेळेस युद्धात सामील न होता आपल्या जहागिरीत जाऊन बसले होते. खुर्रम उत्तर हिंदुस्थानात जाताच जाधवराव परत मोगली
चाकरीत शिरले.
?? आत्ता शहाजीराज्यांबद्दल माहिती
इ.स. १६२३ च्याखंडागळे प्रकरणामूळे जाधव आणि भोसले घराण्यात वितुष्ट
आली होती. हे मागे बघितले. पुढे शहाजी राजे भातवाडीच्या लढाई (१६२४-२५) नंतर भाऊ बंधकीमूळे निजामशाही सोडून इ.स. १६२५ अखेर आदिलाशाहाची “सरलश्करी” पत्करली.
हि सरलश्करी शहाजी राजांनी १६२८ च्या पावसाळ्या पर्यंत केली ह्यास कागद पत्रांची पुष्टी मिळते. अर्थात अश्या काळात आदिलशहाकडे असताना १६२७ लाच जिजाऊना शिवनेरी
(निजामशाहीत ) गडावर ठेवणे अशक्य आहे.
पुढे बखरींच्याच वर्णना नुसार, जिजाऊ व ३-४ वर्षाचा मुलगा संभाजी शहाजी महाराजांबरोबर विजापुरी गेल्याचे आढळते.
मग १६२७ चाच जन्म गृहीत धरायचा झाल्यास तो विजापूरचा अथवा कर्नाटकातील धरायला लागतो. परंतु जिजाउंना संभाजी राज्यांनंतर ४ मूले अल्पजीवी निपजली. यातील निदान २ तरी १६२५ – १६२८ च्या विजापुरी मुक्कामातील असली पाहिजेत या वरून जिजाऊ
शहाजी महाराजांसोबतच विजापूरला गेल्या हे सिद्ध होते व शिवाजी राजांचा जन्म १६२८ च्या पावसाळ्या नंतरच ग्राह्य धरावा लागतो.
तसेच निजामशाही बुडत आहे हे बघून शहाजी राज्यांनी अनेक मराठा सरदारांना एकत्रित करून बंडाळी उठवली, ती १६२९ ला म्हणजे १६२८ ला आदिलशाही सोडून ते निजामशाही
कडे आले वा १६२९ ला बंड उठवले त्यात जाधवरावही सहभागी होते. अर्थात १६२३ च्या खंडागळे प्रकारानंतर जाधवराव – शहाजी जिजाऊ यांचा जो काही संबंध आला
असावा तो १६२९ या सालीच. नंतर ऑगस्ट मध्ये १६२९ लाच जाधवरावांना मारण्यात आले. म्हणजे त्या नंतर संबंध येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वा त्या आधी त्यांच्या भेटीची शक्यताच
न्हवती म्हणून तो संबंध १६२९ या सालचाच असावा. पुढे जाधावरावांना धोक्याने मारल्या मूळे शहाजी राजांनी निजामशाही सोडण्याचे ठरवले वा त्यांनी आपल्या जहागिरीत जाऊन मोघालांशी संधान साधले. ह्या दरम्यानच शिवनेरी
वरील निजामी चाकरीत असलेला वैभवशाली विजयराज ह्याच्या मुलीशी (जयंती) आपला मुलगा संभाजी ह्याचे विवाह लावून दिला. तो काळ १६२९ नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आणि लग्न लावून दिल्यावर शहाजी राजे दुसऱ्या पंधरवड्यात मोगलांची पंचहजारी सरंजाम वा संभाजीला हजारी घेतली.
संभाजीच्या लग्नाच्या वेळेस जिजाऊ ६-७ महिन्याची गरोदर असाव्यात असा तर्क निघतो व त्यामूळे आपल्या समध्याकडे जिजाऊना संरक्षणास ठेवले हा तर्क जास्त संयुक्तिक आहे.
त्यामुळे जाधवराव पाठीमागे लागले म्हणून न्हवे तर जाधवरावांचा खून झाल्यामुळे निजामी मंत्र्याच्या सुडार्थ शहाजी महाराजांनी मोघलांना जाऊन मिळायचे ठरवले तेव्हा संभाजीचे लग्न लाऊन जिजाऊना शिवनेरी ठेवले.
जिजाऊंच्या भावाचा मेव्हणा आणि मुलगा संभाजी ह्याचा सासरा विजयराजा असा दुहेरी संबंध जोडला गेल्याने जिजाऊंच्या संरक्षणाची संपूर्ण खात्री पटल्यावर शहाजी महाराज मोघलांना जाऊन मिळाले.
अश्या प्रकारे १६३० साली शिवनेरी वरच शिवरायांचा जन्म झाला असा निष्कर्ष काढता येतो.
?? संदर्भ ग्रंथ
- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ले. वा सी बेंद्रे
- छत्रपती शिवाजी ले चरित्र ,निनाद बेडेकर
- पॅटर्न शिवरायांचा ले प्रा सतीश कुमदाळे
- राजा शिवाजी खंडकाव्य ले म.म. कुंटे
- शिवरायांचे कष्टकरी मावळे ले दत्ता नलावडे
- कुळवाडी भूषण शिवराय ले श्रीकांत देशमुख





