अखेर ईसापुर गावात ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव अर्जुन पवार. यांची बंडखोरी .गटविकास अधिकारी कडे तक्रार दाखल…………
राजेश सोनुने
परतवाडा येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत ईसापुर येथील ग्रामसेवक अर्जुन पवार हे सतत महीन्यातुन 18 ते 20 दिवस
गैरहजर राहत असुन गावातील शालेय मुलामुलींना तसेच गावातील रोजगार हमी योजनेमध्ये काम करत असलेल्या मजुरांच्या मष्ट्ररवर वेळेवर सहया करीत नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच गावातील नागरिकांना काहीही काम पडल्यास ग्रामसेवक यांना वारंवार फोन करून बोलावे लागतो. असे बोलावतांना अर्जुन पवार साहेब म्हणतात मी तुमचा नौकर नाही उलट तुम्ही माझे नौकर आहे तुम्ही जे करायचे ते करा.अशा प्रकारे गावातील लोकांना एकप्रकारे धमक्या देत आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते कैलास वानखडे तथा संजय युवराज मोहड इत्यादिनी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार नोंदवली आहे.तेव्हा आम्ही लगेच कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत चे सचिव हे गावात राहून डिवटी करतीँल अशा प्रकारे मागणी केली आहे.