ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे विरार येथे सप्टेंबर मध्ये राष्ट्रीय अधिवेशन
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे (आईजा संस्था) दि. २१/२२ सप्टेंबरला विरार – मुंबई येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनात खान्देशातुन अनेक जैन पत्रकार सहभाग घेणार आहेत
ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे (आईजा संस्था) प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिकजी हुंडीयाच्या नेतृत्वाखाली दि २१ व २२ सप्टेंबर रोजी
आगाशी तिर्थ विरार – मुंबई येथे होणार आहे या अधिवेशनात संपूर्ण भारतातून जवळपास ७०० जैन पत्रकार सहभागी होणार आहेत दि .२१ सप्टेंबर रोजी सकाळी आगमन आणि स्वागत तदनंतर १० वाजता बँड पथकासह दादा गुरुदेवच्या दर्शनासाठी जाणार आहेत सकाळी ११ वाजता अधिवेशनेच्या पहिल्या सत्रास सुरुवात होणार दीपप्रज्वलनाने अधिवेशनाला सुरुवात होणार आहे भारतातून आलेल्या सर्व जैन पत्रकाराचे परीचय, अधिवेशनात अडीअडचणी, समस्या सादरीकरण करणार आहेत दुपारी १ ते २ वाजेपर्यंत स्नेहभोजन घेणार आहोत स्नेहभोजन नंतर दुपारी २ ;३० ते ५ वाजेपर्यंत आईजा संस्थेत सर्वंउत्कृष्ठ कार्य करणाऱ्याचा सन्मान ,गौरव करण्यात येणार आहे संध्या. स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्या नंतर रात्री ८ ;३० वाजता संगीतमय भजनसंध्या या भजनसंध्या मध्ये गायक म्हणून आईजाचेच प्रतिनिधी राहणार आहेत दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्नात्र पूजा होणार आहे ११ ते १ वाजेपर्यंत ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशन व आम्ही , जैन एकता मध्यें आईजाची भूमिका काय ? या विषयावर उद्धबोधन होणार आहे दुपारी १ वाजता स्नेहभोजन ,दुपारी २;३० वाजता संपुर्ण भारतातून जैन पत्रकारातून जैन धर्मात अनमोल कार्य करणाऱ्या व्यक्तीचे सन्मान होणार आहे दुपारी ४ वाजता फराळ आणि संध्याकाळी ५ वाजता अधिवेशन समारोप करण्यात येणार आहे तदनंतर विदाई सोबतच पुढच्या अधिवेशनाचे आखणी करण्यात येणार आहे असे दोन दिवसीय अधिवेशनात खान्देशातुन अनेक पत्रकार सहभागी होणार आहे याबाबत नाव नोंदणी साठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप कावेरीया व खान्देश सद्स्य लतीश जैन (चोपडा) यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिकजी हुंडीया यांनी केले आहे
जैन पत्रकाराचे राष्ट्रीय अधिवेशन भारतात सर्व प्रथम होत आहे आणि प्रथम अधिवेशनाला ऐतिहासिक बनवायचे आहे या अधिवेशनात अनेक राज्याचे जैन पत्रकार येणार आहेत जैन पत्रकारांच्या अधिवेशना मार्फत आपण समाजासाठी काय करू शकतो ? या विषयावर विचार विनिमय होणार आहे तसेच जैन समाजात अनेक गरीब कुटुंब आहेत त्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया यांनी सांगितले.







