सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतून जागे कधी होणार?
संजय पवार
वराड ता धरणगांव वार्ताहर येथील राष्ट्रीय महामार्ग हा फक्त नावाला असुन रस्त्यांमध्ये खड्डे नसुन खड्ड्यात रस्ता आहे तोही पुर्ण चाळण झालेला दिसत आहे. पाळधी ते एरंडोल दरम्यान चा महामार्ग नसुन अपघात मार्ग बनलेला आहे सर्व डोळ्यासमोर दिसुन सुद्धा शासन,सा.बां.प्रशासन ,लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेऊन मुग गिळून गप्प बसले आहेत.
यांना आणखी किती वाहन धारकांचा जिव घ्यायचा आहे असा संतप्त सवाल परिसरातील जनतेला प्रश्न पडलेला आहे.लवकर रस्त्याची दुरुस्ती नाही केली तर रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा परिसरातील नागरिकांनी केली आहे.