कालच्या एका पावसाने या वास्तूची वॉल कम्पाउंड ची (भिंत) कोसळली
महाराष्ट्राचे मूखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने काही महिन्यांपूर्वीच या भव्यदिव्य वास्तू चे दिमाखात उदघाटन केले
रफिक अतार
पंढरपूर येथे कालच्या एका पावसाने या वास्तूची वॉल कम्पाउंड ची (भिंत) कोसळली ही घटना रात्री झाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही ही च घटना जर दिवसा घडली असती तर नक्कीच येथे जीवितहानी घडली असती ही भिंत लाईट च्या डेपो (पोल) वर पडल्याने शॉट सर्किट ही होऊन मोठी जीवितहानी झाली असती हे नाकारता येत नाही,
काही महिन्यांपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे अध्यक्ष यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून या भव्यदिव्य भक्त निवासाचे उदघाटन केले आचारसंहिता लागू होण्याआधी कामाचे श्रेय लाटण्या च्या नादात या वास्तू चे घाईगडबडीत उदघाटन करून गेले, तल्लब 72 कोटी खर्च करून हे वास्तू बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी राहण्यासाठी हे भक्त निवास बांधले आहे,
या भक्त निवास मध्ये सर्वच निष्कृठ दर्जाचे काम झाले आहे आज भिंत पडली उद्या या वास्तू च कुठलाही भाग पडून जीवितहानी होऊ शकते याला कोण जबाबदार,,,
हे निष्क्रिय काम झाकण्यासाठी समिती ठेकेदार प्रशासन पडदा लावून दुरूस्ती चे काम करत आहे,,
तरी आम्ही पंढरपूरकर व शिवक्रांती संघटना या सरकार चा व समितीचा जाहीर निषेध करत आहे,लवकरात लवकर या घटनेला जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदाराव योग्य ती कारवाई न झाल्यास शिवक्रांती संघटना भाविकांना सोबत घेऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र असे आंदोलन करेन यांची प्रशासने नोंद घ्यावी,,,