World

T20 Live…भारताचा सेमी फायनल मध्ये प्रवेश होऊ शकतो..!7 नोव्हेंबर रोजी होईल निर्णय..!

T20 Live…भारताचा सेमी फायनल मध्ये प्रवेश होऊ शकतो..!7 नोव्हेंबर रोजी होईल निर्णय..!

यावर्षी दुबई येथे होत असलेला विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची स्थिती प्रथमपासूनच निराशाजनक सुरु आहे.सतत दोन सामन्यात पराभव झाल्या मुळे भारत सेमी फायनल मध्ये जागा मिळवू शकणार नव्हता.पण आता मात्र भारताचा प्रवेश सेमी फायनल मध्ये होऊ शकतो.नुकताच अफगाणिस्तान विरुद्ध भारत सामन्यात भारताने 66 धावांनी विजय मिळवला आहे. राहुल आणि रोहितच्या अर्धशतकानंतर पंत आणि पंड्याच्या फिनींशिंगने भारताने 210 धावांचा डोंगर उभा करत गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत अफगाणिस्तानची फलंदाजी रोखत 66 धावांनी विजय मिळवला.

पण एव्हड्या वरच हा प्रवेश निश्चित नसून न्यूझीलंड ग्रुप फेरीतील अखेरची लढत अफगाणिस्तानविरुद्ध ७ नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. या लढतीवर भारताचे सेमीफायनलचे तिकिट ठरेल. अफगाणिस्तान जिंकल्यास भारताला दुसऱ्या दिवशी म्हणजे नामिबियाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळून पुढील फेरीत प्रवेश करता येईल. त्यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांची नजर ७ नोव्हेंबर रोजी दुपारी होणारी लढतीवर असेल.तसेच रनरेट आणि विकेट च्या आधारे देखील टीम इंडिया सेमी फायनल मध्ये प्रवेश होऊ शकतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button