Aurangabad

क्षुल्लक कारणावरून भवानीनगरात तुफान दगडफेक

क्षुल्लक कारणावरून भवानीनगरात तुफान दगडफेक

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : सध्याच्या काळात औरंगाबाद शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असताना दिसून येते आहे. आज घरासमोरील ओट्यावर बसण्यास व मज्जाव केल्याच्या कारणावरून टोळक्याने भवानीनगरात तुफान दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे दोन गट समोरासमोर आले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस प्रशासनाला तत्काळ दखल घेण्याची सूचना केल्याने हा मोठा अनर्थ टळला.

औरंगाबाद शहरातील भवानीनगरातील गल्ली नं. ६ येथे दादा कॉलनीतील काही टवाळखोरांनी ओट्यावर बसून सिगारेट पित येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत होते. यावर त्यांना बसण्यास मज्जाव केला असता टोळक्याने दगडफेक करण्यास सुरुवात केली. या सदर घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरात प्रचंड तणाव असल्याने पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक मनोज बल्लाळ, राजेश जाजू, बळीराम देशमाने, विकास लूटे, अशोक महानोर, गणेश काथार, करण कपूर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button