Bollywood

हिला कोणीतरी आवरा रे..!कंगना पुन्हा बरळली..!गांधीजी नेताजी आणि भगतसिंग आता निशाण्यावर..!

हिला कोणीतरी आवरा रे..!कंगना पुन्हा बरळली..!गांधीजी नेताजी आणि भगतसिंग आता निशाण्यावर..!

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावात ही नेहमीच आपल्या बेताल व्यक्तव्या मुळे चर्चेत असते.आता तर ती थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनिता बोस यांनी आपले वडील महात्मा गांधींचे प्रशंसक होते असंही स्पष्ट केलं आहे.

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.

या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर केला आहे. त्याच्या मथळ्यात असे लिहिले आहे की, तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक… तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. आता ते तुम्हीच ठरवा. दुसरा गाल दिल्याने दान मिळते, स्वातंत्र्य नाही.

ज्यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती, पण सत्तेची भूक होती अशांनी स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांच्या स्वाधीन केले.’ ती पुढे म्हणाली, ‘आपल्याला कोणी एका गालावर थप्पड मारली, तर दुसरा गाल पुढे करा, आणि त्यामुळेच तुम्हाला स्वातंत्र्य मिळते, असे त्यांनीच आम्हाला शिकवले. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळत नाही, अशी भिक्षा मिळू शकते. तुमचे हिरो हुशारीने निवडा.असे तिने म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button